GK: ‘हे’ आहेत भारतातील सर्वात लहान जिल्हे, क्षेत्रफळ फक्त…
भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यात एकूण 797 जिल्हे आहेत. भारतातील काही जिल्हे आकाराने खुप लहान आहेत. मात्र मर्यादित क्षेत्र असूनही, या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या खूप दाट आहे. आज आपण भारतातील सर्वात लहान जिल्ह्यांबद्दल जाणून घेऊयात.

माहे: पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील माहे जिल्हा हा भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 9 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 41816 आहे. लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 4646 व्यक्ती आहे.

मध्य दिल्ली: मध्य दिल्ली हा भारतातील दुसरा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 21 चौरस किलोमीटर आहे आणि एकूण लोकसंख्या 5,82,320 आहे. या जिल्ह्याचा साक्षरता दर 85.14% आहे.

लक्षद्वीप: लक्षद्वीप हा तिसरा सर्वात लहान जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटरआहे. याची लोकसंख्या 58,232 आहे.

यानम: पुदुच्चेरीचा यानम जिल्हा चौथा सर्वात लहान जिल्हा आहे. याचे क्षेत्रफळ 30 चौरस किलोमीटर आहे. याची लोकसंख्या 55,626 आहे. येखील लोकसंख्येची घनता 1854 आहे.

नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 1,42,224 आहे. येथील लोकसंख्येची घनता 4057 आहे.