
बाॅलिवूडचे कलाकार हे नेहमीच आपल्या पर्सनल लाईफबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती देतात. अनेकदा हे चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देखील देतात. सोशल मीडियातून हे कोट्यावधी कमावतात. मात्र, असे बरेच स्टार आहेत, ज्यांनी अचानक सोशल मीडियाला रामराम केला.

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी आयुष्यात फार वाईट काळातून जात आहे. आपण सोशल मीडियाला रामराम करत असल्याचे देखील काजोल हिने म्हटले होते.

आमिर खान हा सततच्या टिकेला कंटाळून सोशल मीडियापासून लांब गेला आहे. फक्त सोशल मीडियाच नाही तर तो चित्रपटांपासून देखील दूर आहे. सोशल मीडियावरील शेवटीची पोस्ट असल्याचे सांगत आमिर खान याने सोशल मीडिया सोडला.

करण जोहर यानेही काही दिवसांपूर्वी अचानकच सोशल मीडियापासून मोठा ब्रेक घेतला होता. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहिचे कारण देत करण जोहर याने सोशल मीडियाला रामराम केला होता.

सोनाक्षी सिन्हा हिने देखील काही दिवसांपासून सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे. सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.