KRK: कमाल आर खानची ही पाच वादग्रस्त वक्तव्ये ठरली होती चर्चेचा विषय

| Updated on: Aug 30, 2022 | 1:18 PM

सर्व खान कलाकारांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे चित्रपट भारतात चालणार नाहीत. कारण हे तिन्ही खान आता म्हातारे आणि अहंकारी झाले आहेत. त्यांना चांगल्या-वाईट स्क्रिप्ट्सची कळत नाहीत - कमाल आर खान

1 / 5
2016 मध्ये अजय देवगणने KRK वर पैसे घेऊन 'शिवाय' चित्रपटाविषयी वाईट बोलल्याचा आरोप करण्यात आला  होता.  अजय देवगणने केआरकेचे कॉल रेकॉर्डिंग शेअर केले होते, ज्यामध्ये 'शिवाय'चे सह-निर्माता कुमार मंगत आणि केआरके यांच्यात संभाषण होते. हा वाद समोर आल्यानंतर केआरकेने आपण पैसे घेतले नसल्याचे म्हटले होते.

2016 मध्ये अजय देवगणने KRK वर पैसे घेऊन 'शिवाय' चित्रपटाविषयी वाईट बोलल्याचा आरोप करण्यात आला होता. अजय देवगणने केआरकेचे कॉल रेकॉर्डिंग शेअर केले होते, ज्यामध्ये 'शिवाय'चे सह-निर्माता कुमार मंगत आणि केआरके यांच्यात संभाषण होते. हा वाद समोर आल्यानंतर केआरकेने आपण पैसे घेतले नसल्याचे म्हटले होते.

2 / 5
अनुराग कश्यपशीही  घेतला होता पंगा . 2020 मध्ये, KRK च्या वेबसाइटच्या अधिकृत पेजवरून  चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती.  ज्यानंतर बराच वाद झाला होता. तथापि, नंतर केआरकेच्या त्याच साइटवर माफीनामा देखील लिहिला गेला. त्यामध्ये लिहिले होते की  'आमच्या एका स्टाफच्या  सदस्याने अनुराग कपूर ऐवजी अनुराग कश्यपला समजले त्यामुळे ही चुकीची  चुकीची बातमी दिली असे त्याने म्हटले होते.

अनुराग कश्यपशीही घेतला होता पंगा . 2020 मध्ये, KRK च्या वेबसाइटच्या अधिकृत पेजवरून चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. ज्यानंतर बराच वाद झाला होता. तथापि, नंतर केआरकेच्या त्याच साइटवर माफीनामा देखील लिहिला गेला. त्यामध्ये लिहिले होते की 'आमच्या एका स्टाफच्या सदस्याने अनुराग कपूर ऐवजी अनुराग कश्यपला समजले त्यामुळे ही चुकीची चुकीची बातमी दिली असे त्याने म्हटले होते.

3 / 5
नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कमाल आर खानने  मुख्यमंत्री योगी यांनाही सोडले नाही. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी, KRK ने ट्विट करून घोषणा केली होती, 'आज मी शपथ घेतो की 10 मार्च 2022 रोजी योगीजींचा पराभव झाला नाही, तर मी भारतात परत येणार नाही! जय बजरंग बली '

नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कमाल आर खानने मुख्यमंत्री योगी यांनाही सोडले नाही. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी, KRK ने ट्विट करून घोषणा केली होती, 'आज मी शपथ घेतो की 10 मार्च 2022 रोजी योगीजींचा पराभव झाला नाही, तर मी भारतात परत येणार नाही! जय बजरंग बली '

4 / 5
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी 2016 मध्ये एक फोटोशूट केले होते.या  फोटोशूटनंतर केआरकेने आलियाला मुलगीसह इतरही  अनेक आक्षेपार्ह बोलला होता. केआरकेच्या ट्विटनंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​संतापला आणि त्याने केआरकेला मूर्खपणा थांबवण्याचा सल्लाही दिला होता

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी 2016 मध्ये एक फोटोशूट केले होते.या फोटोशूटनंतर केआरकेने आलियाला मुलगीसह इतरही अनेक आक्षेपार्ह बोलला होता. केआरकेच्या ट्विटनंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​संतापला आणि त्याने केआरकेला मूर्खपणा थांबवण्याचा सल्लाही दिला होता

5 / 5
कमाल आर खान काही दिवसांपूर्वीच नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा आढावा घेत त्याने चित्रपटांची खिल्ली उडवली होती. तसेच अलीकडेच त्यांने बी टाऊनच्या तिन्ही खानांना   म्हातारे म्हणत सांगितले होते की, सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपट भविष्यातही फ्लॉप होतील. केआरकेने ट्विट करून लिहिले होते की, 'सर्व खान कलाकारांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे चित्रपट भारतात चालणार नाहीत. कारण हे तिन्ही खान आता म्हातारे आणि अहंकारी झाले आहेत. त्यांना चांगल्या-वाईट स्क्रिप्ट्सची कळत नाहीत

कमाल आर खान काही दिवसांपूर्वीच नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा आढावा घेत त्याने चित्रपटांची खिल्ली उडवली होती. तसेच अलीकडेच त्यांने बी टाऊनच्या तिन्ही खानांना म्हातारे म्हणत सांगितले होते की, सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान यांचे चित्रपट भविष्यातही फ्लॉप होतील. केआरकेने ट्विट करून लिहिले होते की, 'सर्व खान कलाकारांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे चित्रपट भारतात चालणार नाहीत. कारण हे तिन्ही खान आता म्हातारे आणि अहंकारी झाले आहेत. त्यांना चांगल्या-वाईट स्क्रिप्ट्सची कळत नाहीत