स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाणं, या चार ठिकाणी सूर्यास्त पाहण्यासाठी लोक विदेशातून येतात

जर तुम्हाला देखील संध्याकाळी शांत आणि कमी गर्दी असणाऱ्या ठिकाणी सूर्यास्ताचा आनंद घेयचा असेल तर पुढील चार ठिकाणं तुमच्यासाठी एकदम खास आहेत.

| Updated on: Apr 06, 2026 | 4:51 PM
1 / 5
दिवसभराच्या धावपळीत संध्याकाळी जर तुम्हाला समुद्रकिनारी बसून सूर्य हळूहळू पाण्यात मावळताना बघायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी लोक करतात प्रचंड गर्दी.

दिवसभराच्या धावपळीत संध्याकाळी जर तुम्हाला समुद्रकिनारी बसून सूर्य हळूहळू पाण्यात मावळताना बघायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी लोक करतात प्रचंड गर्दी.

2 / 5
अंडमानमधील राधानगर बीच हा निसर्गाच्या साध्या पण मोहक सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे. इथे पांढरी शुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि कुठलाही गोंधळ नाही. सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंग अतिशय हळुवार बदलत जातात.

अंडमानमधील राधानगर बीच हा निसर्गाच्या साध्या पण मोहक सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे. इथे पांढरी शुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि कुठलाही गोंधळ नाही. सूर्यास्ताच्या वेळी आकाशातील रंग अतिशय हळुवार बदलत जातात.

3 / 5
केरळमधील वर्कला बीच इतर किनाऱ्यांपेक्षा वेगळा आहे. इथे वाळूत नाही तर उंच कड्यांवर बसून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव मिळतो. खाली आदळणाऱ्या लाटा आणि वर कॅफेंची हलकी गडबड. हा संगम या ठिकाणाला खास बनवतो.

केरळमधील वर्कला बीच इतर किनाऱ्यांपेक्षा वेगळा आहे. इथे वाळूत नाही तर उंच कड्यांवर बसून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव मिळतो. खाली आदळणाऱ्या लाटा आणि वर कॅफेंची हलकी गडबड. हा संगम या ठिकाणाला खास बनवतो.

4 / 5
गोव्याचा पालोलेम बीच हा त्याच्या शांत वातावरणासाठी ओळखला जातो. त्याचा वक्र आकार असा आहे की सूर्य अगदी समोर मावळताना दिसतो. इथे लोक शांतपणे बसून या क्षणाचा आनंद घेतात.

गोव्याचा पालोलेम बीच हा त्याच्या शांत वातावरणासाठी ओळखला जातो. त्याचा वक्र आकार असा आहे की सूर्य अगदी समोर मावळताना दिसतो. इथे लोक शांतपणे बसून या क्षणाचा आनंद घेतात.

5 / 5
कर्नाटकातील गोकर्ण येथील हे किनारे थोडे दूर असल्यामुळे इथे गर्दी कमी असते. सूर्यास्ताच्या वेळी लोक छोटे-छोटे गट करून बसतात. कोणी गप्पा मारतं तर कोणी शांतपणे निसर्गाचा आनंद घेतं. हीच त्यांची खासियत आहे.

कर्नाटकातील गोकर्ण येथील हे किनारे थोडे दूर असल्यामुळे इथे गर्दी कमी असते. सूर्यास्ताच्या वेळी लोक छोटे-छोटे गट करून बसतात. कोणी गप्पा मारतं तर कोणी शांतपणे निसर्गाचा आनंद घेतं. हीच त्यांची खासियत आहे.

Follow Us