AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ, १४ महिन्यात ७ IPS चे धडाधड राजीनामे, ‘सिंघम’ का घेत आहेत माघार..

युपीएससी परीक्षा देशातील सर्वात अवघड मानली जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर मान, सन्मान आणि प्रतिष्ठा देणारी आयएएस आणि आयपीएस तसेच इतर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळते. मात्र, सध्या आयपीएस अधिकारी धडाधड राजीनामा देत आहेत...

मोठी खळबळ, १४ महिन्यात ७ IPS चे धडाधड राजीनामे, 'सिंघम' का घेत आहेत माघार..
IPS OFFICER
| Updated on: Jul 10, 2026 | 10:09 PM
Share

आयपीएस होण्यासाठी अनेक जण कठोर परिश्रम करत असतात, अनेक तास अभ्यास करुन परीक्षा देतात. मात्र, सध्या देशातील खाकी वर्दीवर अभिमानाने स्टार मिरवणारे आयपीएस धडाधड राजीनामा देत असल्याने चर्चेत आहेत. ताजे प्रकरण आयपीएस अधिकारी जगमोहन मीणा यांचे आहे. ३७ वर्षीय जनमोहन भुवनेश्वरमध्ये डीसीपी होते. आता त्यांनी गुपचूप राजीनामा दिला आहे. जगमोहन भारतीय पोलीस सेवेचे सातवे अधिकारी आहे ज्यांनी गेल्या १४ महिन्यात राजीनामा दिलेला आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये एक प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री ( पीएमओ ) जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले होते की आयपीएसचे ५०५ पदे अजूनही रिक्त आहेत. या वर्षाच्या सुरुवाताली केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले आहे की आयपीएस अधिकाऱ्यांच्या कमतरतेने आयबी आणि सीबीआयमधील अनेक पदे रिक्त आहेत.

राजीनामा देणारे ६ अधिकारी ४० पेक्षा कमी वयाचे

ज्या अधिकाऱ्यांनी गेल्या १४ महिन्यात राजीनामा दिला आहे. त्यात ६ अधिकाऱ्याचे वय ४० हून कमी आहे. म्हणजे जगमोहन मीणा ३७ वर्षांचे आहेत. तर काम्या मिश्रा यांचे वय ३२ वर्षे आहे. सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांचे वय ३५ वर्षे होते. लोकेश्वर सिंह यांचे वय ३८ वर्षे होते. रचिता जुयाल यांनी जेव्हा राजीनामा दिला,तेव्हा त्यांचे वय ३५ वर्षे होते. तर ३३ व्या वयात अभिषेक तिवारी यांनी राजीनामा दिला आहे.

म्हणजे राजीनामा देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांचे सरासरी वय ४० वर्षांहून कमी होते. केवळ नुरुल होदा यांचे वय ४० वर्षांहून अधिक आहे.

सिंघमची नोकरी का सोडत आहेत ?

ज्या सात अधिकाऱ्यांनी गेल्या १४ महिन्यात राजीनामा दिला त्यांची डिटेल स्टडीत तीन मोठी कारणे समोर आली आहेत.

1. बिहारच्या नुरुल होदा आणि काम्या मिश्रा यांनी राजकीय कारणांनी राजीनामा दिला आहे. नुरुल यांनी वक्फ बोर्डच्या विरोधात राजीनामा दिला आहे. नुरुल यानंतर राजकारणात प्रवेश करणार आहेत. याच प्रकारे काम्या मिश्रा देखील राजकारणात येण्याचा प्रयत्न करत आहेत.

2. मध्यप्रदेशचे अभिषेक तिवारी याचे प्रकरण वेगळे आहे. तिवारी यांनी सायबर सिक्युरिटी बिझनसमध्ये जाण्यासाठी आपले पद सोडले आहे. त्यांनी पोलिस सेवेत असताना बहुतांश काळ सायबर क्राईमचा तपास करतानाच घालवला आहे.

3. कॉर्पोरेट नोकरीत जाण्यासाठी आंध्रचे आयपीएस सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिला आहे. आता ते रिलायन्स कंपनीत आहेत. याच प्रकारे उत्तराखंड येथील लोकेश्वर सिंह यांनी राजीनामा देऊन ते युएनला गेले होते. तेथे त्यांना नोकरी मिळाली आहे.

4. ओडिशा काँग्रेसचे अध्यक्ष भक्त चरण दास यांनी म्हटले आहे की ज्या प्रकारे तरुण अधिकारी राजीनामा देत आहेत ते पाहाता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन स्थिती स्पष्ट केली आहे.

आयपीएस अधिकारी राजीनामा देऊ शकतात ?

ऑल इंडिया सर्व्हीस रुल्स १९५८ मध्ये याची तरतूद आहे. या अधिकाऱ्यांचा राजीनामा केंद्र सरकार स्वीकार करते. राजीनामा जोपर्यंत सरकार स्वीकार करत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम राहावे लागते.

सर्व्हीस रूल्स ५ (१) च्या मते राजीनामा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवृत्ती नंतर मिळणारे फायदे मिळत नाहीत. मात्र, राज्य सरकारची इच्छा असेल तर दया आधारित भत्ता देऊ शकते.

एवढेच नव्हे तर आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेण्याची संधी देखील दिली जाते. ९० दिवसांच्या आत जर अधिकाऱ्यांनी जर अर्ज केला तर त्यांची सर्व्हीस पुन्हा बहाल केली जाते. यासाठी अधिकाऱ्यांचे जुने रेकॉर्ड्स पाहिले जातात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा