AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!

बीसीसीआयच्या निवड समितीने वैभव सूर्यवंशीची निवड आयर्लंड, इंग्लंड आणि आता झिम्बाब्वे दौऱ्यावर केली आहे. आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी मिळाली नाही. त्यामुळे गंभीरसहीत संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली पण फेल गेला.

IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!
IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2026 | 10:27 PM
Share

आयपीएल स्पर्धेत आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यात अखेर संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचं पदार्पण झालं असून तीन सामने खेळला आहे. मात्र तिन्ही सामन्यात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. वैभव सूर्यवंशीने तीन सामन्यात अनुक्रमे 14, 13 आणि 15 अशा धावा केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वैभव सूर्यवंशीची सुरूवात पाहून काही जाणकारांनी सामान्य प्रक्रिया असल्याचं सांगत टीका टाळली आहे. तर काही जाणकारांच्या मते, युवा खेळाडूला घाई गडबडीत संघात संधी दिली गेली आहे, असं म्हणणं मांडलं आहे. दुसरीकडे, खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीसह संघाच्या खेळीवर गौतम गंभीर नाराज असल्याची चर्चा आहे. चौथ्या टी20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला समज दिल्याची चर्चा आहे. डगआऊट जवळ त्यांच्या हावभावावरून सोशल मीडियावर हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांपेक्षा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडियावर काहीही वावड्या उठल्या तरी प्रत्यक्षात मैदानात काय करायचं हे त्यांच्या हातात असतं. त्यामुळेच ब्रिस्टलमधील चौथ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर खूश नसल्याचं बोललं जात आहे. मुक्त पत्रकार अंकन कारच्या एका रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने मैदानात वैभव सूर्यवंशीसोबत जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चा केली.

रिपोर्टनुसार, सामना संपल्यानंतर जेव्हा प्रेजेंटेशन सुरू होतं तेव्हा भारतीय संघाच्या डगआऊटमध्ये गंभीर आणि वैभव यांच्यात चर्चा सुरू होती. ही चर्चा नाही तर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापल्याचं त्याच्या हावभावावरून दिसत होतं. गौतम गंभीर संतापून वैभव सूर्यवंशीला काही तरी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याचा चेहरा आणि हावभावावरून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता शेवटच्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? तसेच या संधीचं सोनं वैभव करणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल