AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!

बीसीसीआयच्या निवड समितीने वैभव सूर्यवंशीची निवड आयर्लंड, इंग्लंड आणि आता झिम्बाब्वे दौऱ्यावर केली आहे. आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी मिळाली नाही. त्यामुळे गंभीरसहीत संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली पण फेल गेला.

IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!
IND vs ENG: गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला झापलं? तिसऱ्या सामन्यात फेल गेल्यानंतर सुनावलं!Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2026 | 10:27 PM
Share

आयपीएल स्पर्धेत आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यात अखेर संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचं पदार्पण झालं असून तीन सामने खेळला आहे. मात्र तिन्ही सामन्यात फेल गेल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. वैभव सूर्यवंशीने तीन सामन्यात अनुक्रमे 14, 13 आणि 15 अशा धावा केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वैभव सूर्यवंशीची सुरूवात पाहून काही जाणकारांनी सामान्य प्रक्रिया असल्याचं सांगत टीका टाळली आहे. तर काही जाणकारांच्या मते, युवा खेळाडूला घाई गडबडीत संघात संधी दिली गेली आहे, असं म्हणणं मांडलं आहे. दुसरीकडे, खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीसह संघाच्या खेळीवर गौतम गंभीर नाराज असल्याची चर्चा आहे. चौथ्या टी20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने वैभव सूर्यवंशीला समज दिल्याची चर्चा आहे. डगआऊट जवळ त्यांच्या हावभावावरून सोशल मीडियावर हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर रंगणाऱ्या चर्चांपेक्षा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. कारण सोशल मीडियावर काहीही वावड्या उठल्या तरी प्रत्यक्षात मैदानात काय करायचं हे त्यांच्या हातात असतं. त्यामुळेच ब्रिस्टलमधील चौथ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर खूश नसल्याचं बोललं जात आहे. मुक्त पत्रकार अंकन कारच्या एका रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, सामना संपल्यानंतर गौतम गंभीरने मैदानात वैभव सूर्यवंशीसोबत जवळपास 10 ते 15 मिनिटं चर्चा केली.

रिपोर्टनुसार, सामना संपल्यानंतर जेव्हा प्रेजेंटेशन सुरू होतं तेव्हा भारतीय संघाच्या डगआऊटमध्ये गंभीर आणि वैभव यांच्यात चर्चा सुरू होती. ही चर्चा नाही तर प्रशिक्षक गौतम गंभीर संतापल्याचं त्याच्या हावभावावरून दिसत होतं. गौतम गंभीर संतापून वैभव सूर्यवंशीला काही तरी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याचा चेहरा आणि हावभावावरून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता शेवटच्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? तसेच या संधीचं सोनं वैभव करणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला