AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : विवाहित महिलांनी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, घर स्वर्ग बनेल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : विवाहित महिलांनी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, घर स्वर्ग बनेल
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 10, 2026 | 10:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये पती-पत्नीचं नातं कसं असावं? संसार कसा करावा? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत?  याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी हे संसार रूपी रथाची दोन चाकं असतात. दोन्ही चाकं जोपर्यंत समान गतीने धावतात, तोपर्यंत तो रथ हा व्यवस्थित धावतो, परंतु जर यापैकी एक चाक जरी मागे पडलं तरी संसार उद्धवस्त होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य म्हणतात ज्याप्रमाणे पतीची काही कर्तव्य असतात, त्याचप्रमाणे पत्नीची देखील काही कर्तव्य असतात, विवाहित महिलांनी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आदर – चाणक्य म्हणतात विवाहित महिलेनं घरातील मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर करावा, त्यांना योग्य तो मान सन्मान द्यावा. कारण या व्यक्तींचा अनुभव तुमच्यापेक्षा खूप जास्त असतो. या व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांचा योग्य तो आदर केला पाहिजे.

मुलांवर संस्कार – चाणक्य म्हणतात एक आई आपल्या मुलांवर जेवढे चांगले संस्कार करू शकते तेवढं इतर कोणीही त्या मुलांवर संस्कार करू शकत नाही. एक सशक्त पिढी घडवण्यामध्ये महिलांचा सर्वात मोठा वाटा असतो, त्यामुळे आपल्या मुलांवर संस्कार करण्याची मोठी जबाबदारी ही आईची असते.

बचत – चाणक्य म्हणतात कोणतीही महिला मुळातच काट कसरी स्वभावाची असते, परंतु पती जो पैसा कमावतो, त्यातील काही पैशांची महिलांनी बचत केली पाहिजे, हे पैसे तुमच्या वाईट काळात तुमच्या मदतीला येतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल