10 रुपयांचा वडापाव आता तब्बल…युद्धाचा खवय्यांना मोठा दणका; किंमत वाचून बसेल धक्का!
इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे भारतात खाद्य तेलदेखील महागले आहे. भविष्यातही खाद्यतेल असेच महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खाद्यतेल महागल्याने आता सर्वांचा आवडता वडापावही महागला आहे. पुण्यात वडापावची किंंमत वाढली आहे.

अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका भारताला वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या रुपात बसत आहे. भारताला सर्वात मोठा फटका म्हणजे इंधन महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे त्याची थेट झळ सामान्यांना बसत आहे. दुसरीकडे अनेक खाद्यपदार्थही महागले आहेत. भविष्यात ही महागाई जास्तच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती पूर्ववत न झाल्यास आणखी मोठा संकट ओढाऊ शकते, असे बोलले जात आहे.

इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे भारतात खाद्य तेलदेखील महागले आहे. भविष्यातही खाद्यतेल असेच महागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खाद्यतेल महागल्याने आता सर्वांचा आवडता वडापावही महागला आहे. पुण्यात वडापावची किंंमत वाढली आहे.

सामान्य नागरिकांची भूक भागवणारा वडापाव अगोदर दहा ते पंधरा रुपयांना मिळायचा. आता हाच वडापाव 25 ते 30 रुपयांन मिळत आहे. इंधन दरवाढीचा फटका खाद्यपदार्थाच्या किमतीलाही बसताना पाहायला मिळत आहे.

वडापाव थेट दुप्पट किमतीने महागल्यामुळे आता सामान्यांना खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. आता वडापाव तसेच अन्य खाद्यपदार्थदेखील महाग होऊ शकतात. त्यामुळे इराणचे युद्ध लवकरात लवकर संपावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.