
भारतीय संस्कृतीत वृक्षांना केवळ निसर्गाचा भाग नाही, तर देवाचे रूप मानले जाते. यामध्ये कडुलिंबाचे झाड अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली मानले जाते. केवळ औषधी गुणधर्मांसाठीच नव्हे, तर ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही कडुलिंबाला विशेष महत्त्व आहे.

जर तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील किंवा कुंडलीत मंगळदोष असेल, तर कडुलिंबाचे एक रोप तुमचे आयुष्य बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार कडुलिंबाला साक्षात मंगळ देवाचे रूप मानले जाते.

ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत मंगळ भारी आहे किंवा ज्यांच्या विवाहामध्ये या दोषामुळे विलंब होत आहे. त्यांनी घराच्या परिसरात कडुलिंबाचे झाड लावून त्याची सेवा करावी. असे केल्याने मंगळ ग्रहाची पीडा कमी होऊन जीवनात सुख-समृद्धी आणि स्थैर्य येते.

कडुलिंबाचे झाड घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. वास्तुतज्ज्ञांच्या मते, शनिदेव प्रसन्न होतात. घराबाहेर हे झाड लावल्याने शनीची साडेसाती किंवा अडीचकीचा त्रास कमी होतो. राहू-केतूचे या ग्रहांचे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी हे झाड उपयुक्त ठरते.

रोज सकाळी कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यास संकटांपासून रक्षण मिळते. झाड लावताना दिशा योग्य नसेल तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. कडुलिंबाचे झाड लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते.

कडुलिंबाचे झाड नेहमी मुख्य वास्तूच्या बाहेर असावे, जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात राहील. विशेषतः मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कडुलिंबाची पूजा करणे नशिबात मोठी वृद्धी करणारे ठरते.

वास्तुशास्त्रानुसार, जसे हिरवेगार झाड समृद्धी आणते, तसेच सुकलेले झाड अशुभ मानले जाते. जर तुमच्या घराबाहेरील कडुलिंबाचे झाड वाळले असेल, तर ते कुटुंबात मानसिक तणाव आणि आर्थिक चणचण निर्माण करू शकते. अशा वेळी ते सुकलेले झाड त्वरित काढून त्या जागी नवीन रोप लावणे अत्यंत आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)