
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर काही जणांना जास्त थंडी वाजते. काही जण म्हणतात थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे स्ट्रोक येतो. एक्सपर्टने थंड पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. तसेच थंड पाण्याने आंघोळ करताना काय काळजी घ्यावी, तेही सांगितले.

थंड पाण्याने आंघोळ करताना सरळ डोक्यावर थंड पाणी घेऊ नये. आधी हात आणि पायांवर थंड पाणी टाकावे. त्यानंतर शरीरावर थंड पाणी टाकावे. तुमची प्रकृती लक्षात घेऊन थंड पाण्याने आंघोळीचा निर्णय घ्यावा. तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचा आणि केसांचे नुकसान होते. डोक्यावर सरळ गरम पाणी गेल्यानंतर केस कमकुवत होतात. तसेच केसांमध्ये ड्रायनेस येते आणि चमकही कमी होते. गरम पाणी आंघोळीसाठी चांगला वाटत असले तरी त्याचे अनेक नुकसान आहे.

थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा चमकदार आणि सुदृढ होते. शरीरातील स्नायू मजबूत होतात. तसेच व्यायम आणि इतर शारीरिक हालचालींसाठीही मदत होते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य देखील सुधारते आणि तुमचा ताण कमी होतो.
