
बांगलादेश हा असा देश आहे, जो कधीकाळी भारताचाच अविभाज्य भाग होता. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा फाळणीनंतर हा प्रदेश पाकिस्तानात गेला. कालांतराने पाकिस्तानपासूनही वेगळे होत बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. बांगलादेशात अल्पसंख्याकांची स्थिती फारच नाजूक आहे. तिथे अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

असे असताना या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा किती संख्या होती, ते जाणून घेऊ या. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची संख्या कमी होत गेली आहे.

1971 साली या देशात हिंदूंची संख्या खूप होती. 1971 सालच्या जणगणनेनुसार या देशात तेव्हा एकूण 22 टक्के हिंदू समूदाय होता. नंतर 1901 साली याच भागात हिंदूंची संख्या 33 टक्के होती.1971 सालानंतर बांगलादेशातील परिस्थिती बदलायला सुरूवात झाली.

ये देशातून अल्पसंख्याकांचे पलायन सुरू झाले. 1974 साली तेथे हिंदूंचे प्रमाण 13.5 टक्क्यांपर्यंत कमी झाले. 1991 साली हेच प्रमाण 10.5 टक्के झाले. 2011 सालच्या जणगणनेनुसार आता बांगलादेशात फक्त 8.5 टक्के हिंदू आहेत. 2022 सालापर्यंत बांगलादेशातील हिंदूंचे प्रमाण हे 7.95 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशात एक कोटी 30 लाख हिंदू आहेत. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात मोठे हिंसक आंदोलन सुरू झाले. तेव्हादेखाली अल्पसंख्याकांचे असेच पलायन झाल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशातील गोपालगंज, सिलहट, ठाकुरगाव या भागात हिंदूंची जनसंख्या जास्त आहे.