
विवाह हा एक साधा सोहळा नाही. विवाहानंतर दोघे आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देतात. आयुष्यात सुख-दु:खाच्या क्षणी एकमेकांना साथ देण्याचेही वचन विवाहादरम्यान दिले जाते. म्हणूनच आपल्या समाजात विवाहाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

विवाहाच्या वेळी नवरीने हातात घालावयाच्या बांगड्यांना खूप महत्त्व असते. लग्नात घालावयाच्या बांगड्यांना चुडा म्हटले जाते. महाराष्ट्रात नवरी हिरव्या रंगाचा चुडा घालते. तर पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांत नवरी लाल आणि पांढऱ्या रंगाचा चुडा घालतात.

हा जुडा म्हणजे नवरीला माहेरी प्रेम, आशीर्वाद, सुरक्षा असं सगळंकाही मिळालेलं आहे. नवरी मुलगी अत्यंत लाडात वाढलेल्याचे त्यातून प्रतीत होते, असे म्हटले जाते. हा चुडा म्हणजे मुलगी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करते, याचाही संकेत असतो.

अगोदर मुलीच्या हातात हा चुडा असला की तिचे नुकतेच लग्न झालेले आहे, असे समजून यायचे. हातात चुडा असेल तर नवरीला जास्त काम सांगू नये. तिची काळजी घ्यावी, तिच्याशी प्रेमाने बोलावे असे लोक गृहित धरायचे. अगोदर नवरी एक वर्ष हातात चुडा घालायची.

आता नवरी 40 ते 45 दिवस चुडा घालते. हातातून चुडा काढण्यासाठीही एक विधी असतो. पंजाब, तसेच उत्तरेकडील राज्या चुडा उतरवण्यासाठी एक विधी केला जातो. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)