देवपूजेत चित्त भटकणे म्हणजे महापाप? अखेर त्या उत्तर मिळालं, प्रेमानंद महाराजांनी सागळं सांगितलं
देवाची पूजा करताना अनेकदा आपले मन एकाग्र होत नाही. मुखातून मंत्रोच्चार होतो परंतु मनात मात्र दुसरेच विचार सुरू असतात. अशा वेळी आपली पूजा फलदायी ठरते का? असे विचारले जाते.

देवाची पूजा करताना अनेकदा आपले मन एकाग्र होत नाही. मुखातून मंत्रोच्चार होतो परंतु मनात मात्र दुसरेच विचार सुरू असतात. अशा वेळी आपली पूजा फलदायी ठरते का? असे विचारले जाते. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..

प्रेमानंदजी महाराजांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. तुमचे मन पूजा करताना एकाग्र होत नसेल तर नकारात्मक होण्याची गरज नाही, असे ते सांगतात. तसेच तुम्ही देखावा करण्याऐवजी प्रांजळ मनाने देवाची भक्ती करा, असेही ते सांगतात.

तुमच्या मनात काय चालू आहे, यापेक्षा तुम्हाला देवाची खरंच भक्ती करायची आहे की नाही, हे फार महत्त्वाचे आहे. देव तुमचे भाव बघतो. तुमचे प्रयत्न बघतो, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले आहे.

तुम्ही पूजा करताना तुमचे मन इकडे तिकडे भटकत असेल तर ती पूजा व्यर्थ जात आहे, असे मानने चुकीचे आहे. तुम्ही पुजेला बसणे, दिवा लावणे, फुल अर्पण करणे या गोष्टी व्यर्थ नसतात असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.