
सापांचं विश्व हे फारच चमत्कारिक असतं. या जगात सापाच्या अनेक प्रजाती आहेत. यातील काही प्रजाती या विषारी आहेत तर काही विषारी नसतात. परंतु लोक प्रत्येक सापाला घाबरतात. त्यामुळे साप दिसला की अगोदर त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो.

काही सांपाचे विष खूपच संहारक असते. या सापांनी एकदा चावा घेतला की पुढच्याच काही क्षणात संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. फक्त व्यक्तीच नव्हे तर विषारी सापाने प्राण्याला दंश केला तरीदेखील उपचार न मिळाल्यास संबंधित प्राण्याचाही मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, सापांनी एकमेकांनाच दंश केला तर नेमकं काय होतं? असं अनेकदा विचारलं जातं. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या. जेव्हा सापांच्या प्रजननाची वेळ असते तव्हा नर साप मादी सापाला मिळवण्यासाठी अन्य सापांना दशं करू शकतो किंवा एखादा साप शत्रू वाटला की एक सपा दुससऱ्या सपाला चावू शकतो.

एकाच प्रजातीचे साप एकमेकांना चावले की त्या सपांच्या विषाचा प्रभाव जवळपास होत नाही. कारण त्या विषापासून सुरक्षा व्हावी यासाठी संबंधित सापाच्या शरीरात अगोदरपासूनच प्रतिकारक क्षमता विकसित झालेली असते.

सापांमध्ये सापाच्याच विषापासून बचाव करण्यासाठी प्रतिकाशक्ती तयार झालेली असते. ही प्रतिकारशक्ती जन्मत:च नसते. परंतु साप जसा-जसा मोठा होतो, तसे-तसे या क्षमतेचा विकास होतो. त्यामुळेच अनेकदा एखाद्या सापाने दंश केला तरी दुसरा साप मरत नाही.