

तुटलेली भांडी, फर्निचर किंवा घरात ठेवलेली कोणतीही तुटलेली वस्तू हे नकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. ते घराबाहेर फेकून दिले पाहिजे. तसेच जे कपडे तुम्ही घालत नसाल ते दान करावेत. जुने कपडे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी ते घराबाहेर काढा.

जुनी वर्तमानपत्रे, मासिके किंवा घरातील इतर कोणत्याही निरुपयोगी वस्तू या भरपूर जागा व्यापतात आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तसेच गंजलेल्या लोखंडी वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात. हे देथील नकारात्मक उर्जेचे स्त्रोत मानले जातात.

सुकलेली अथवा वाळलेली फुलं घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. दिवाळीच्या आधी नवीन फुले ठेवा. तसेच काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू घरापासून दूर ठेवा. या गोष्टी काढून टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

दिवाळी हा नव्या सुरुवातीचा सण आहे. या गोष्टी काढून टाकून तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करू शकता. असे मानले जाते की या उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनसंपत्ती येते.

दिवाळीच्या दिवशी घरात दिवे प्रज्वलित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. मंदिर स्वच्छ ठेवा आणि देवी-देवतांना फुले अर्पण करा. गायत्री मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)