AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा दिल्ली खतरे में है; अब्दुल सत्तारांची टोलेबाजी

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा दिल्ली खतरे में है; अब्दुल सत्तारांची टोलेबाजी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 08, 2020 | 8:17 PM
Share

नाशिक : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर देशभरातील एक्झिट पोलने राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा ‘दिल्ली खतरे में है’. यातून त्यांनी बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यास केंद्रातील मोदी सरकार देखील जाणार असल्याचा दावा केलाय (Abdul Sattar criticize Chandrakant Patil and Modi Government over Bihar Exit Poll).

अब्दुल सत्ता म्हणाले, “बिहारचा निकाल हा भाजपच्या राजकारणासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी एक वेगळी कलाटणी देणारा असेल. ही निवडणूक देशाच्या राजकारणात परिवर्तन करणारी राहील. एकदा हा एक्झिट पोल एक्झॅक्ट बसला, तर दिल्लीही ‘खतरे में है’.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून घेण्यात आलेली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट आणि राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड यावर बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली. “महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी देताना सर्व निकष पाहून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल महोदय त्याला नाकारतील असं मला वाटत नाही. राज्यपाल मंजुरी देतील. चंद्रकांत पाटील यांना भेट घेण्याचा चान्सच नसल्याने ते राज्यपालांच्या भेटीसाठी गेले,” असं मत सत्तार यांनी व्यक्त केलं.

“निवडणुकीसाठी अजून 4 वर्ष बाकी आहेत. ज्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही ते राजीनामा मागत आहेत. ते प्रत्येकाचाच राजीनामा मागत आहेत. त्यांच्या मागणीनुसार राजीनामा घेतला तर राजीनाम्याचे निकष बदलावे लागतील,” असाही टोला सत्तार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मुंबईत विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या आंदोलनावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “सध्याचं सरकार मराठा बांधवांच्या बिलकुल विरोधात नाही. राज्य सरकारने दिलेलं आरक्षण टिकावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. काही लोक मराठा समाज आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कृपया हे प्रयत्न करू नयेत.”

हेही वाचा :

तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतात काय?; अब्दुल सत्तार भडकले

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

व्हिडीओ पाहा :

Abdul Sattar criticize Chandrakant Patil and Modi Government over Bihar Exit Poll

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...