अशोक चव्हाणांसोबत झालेल्या खडाजंगीवर अजित पवार म्हणतात…

| Updated on: Jan 03, 2020 | 12:09 PM

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात खातेवाटपाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या वृत्तावर स्वतः अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar and Ashok Chavan dispute News).

अशोक चव्हाणांसोबत झालेल्या खडाजंगीवर अजित पवार म्हणतात...
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात खातेवाटपाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याच्या वृत्तावर स्वतः अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे (Ajit Pawar and Ashok Chavan dispute News). काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं. काँग्रेसच्या खातेवाटपाचा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सांगतील त्याप्रमाणे होईल आणि शिवसेनेबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याने तेच यावर निर्णय घेतील, असंही त्यांनी नमूद केलं (Ajit Pawar and Ashok Chavan dispute News).

अजित पवार म्हणाले, “काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी आहे. मी त्या वृत्तपत्राच्या संपादकांशी बोललो. त्यांच्या इतर सहकाऱ्यांशीही बोललो. तुम्ही माझ्या बोलल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याशी बोला. अशोक चव्हाण यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी एकेकाळी ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सहकारी म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मी ही बातमी देणाऱ्या संबंधित वृत्तपत्राच्या प्रमुखांशी बोललो. संपादकांशी बोललो.”

ज्या पत्रकाराने बातमी दिली त्या पत्रकारांनी अद्याप फोन उचलला नाही. मी त्यांनाही विचारणार आहे. त्यांच्याकडे जर दुसऱ्या बातम्या देण्यासाठी नसतील तर ठिक आहे. पण इतक्या धादांत खोट्या बातम्या दिल्यास त्यांची विश्वासहार्यता कमी होईल, असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“भांडायचं, वाद घालायचं कारण काय?”

अजित पवार यांनी पुरातनवर झालेल्या खातेवाटपाच्या बैठकीबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, “एकतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही बैठकीला नव्हते. गुरुवारी (2 जानेवारी) पुरातनच्या बैठकीत मी, जयंत पाटील, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि शिवसेनेचे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हजर होते. सर्व माध्यमं बाहेर होती. आमचा चेहरा पाहून कुणाला तरी असं वाटले का आमचं भांडण झालं. यात भांडायचं वाद घालायचं कारण काय? राष्ट्रवादीला जी खाती मिळाली ती मिळालीच आहेत. अजून एक महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार होतं, ते विस्तारवाढीला देण्याचं ठरलं होतं.”