शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत, जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

| Updated on: Aug 27, 2019 | 5:16 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) हे पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोडून मुंबईत दाखल झाले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता जामिनासाठी या नेत्यांची (Ajit pawar) धावपळ सुरु झाली आहे. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नावं आहेत.

शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत, जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव
Follow us on

मुंबई : फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य सहकारी बँकेच्या माजी संचालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) हे पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोडून मुंबईत दाखल झाले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर आता जामिनासाठी या नेत्यांची (Ajit pawar) धावपळ सुरु झाली आहे. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नावं आहेत.

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने पाच दिवसात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला.

25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.

1961 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्टेट को ऑप बँकेत संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूतगिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यावधींची कर्ज दिली. या संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण अशा काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या तत्कालिन संचालकांनी आपल्या काळात सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांना कोट्यावधींची कर्ज दिली. पण या कर्जांची परतफेड न झाल्याने बँकेला प्रचंड तोटा झाला.