AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 फेब्रुवारीपर्यंतच बदल्या करा, निवडणूक आयोगाचे पत्र

नवी दिल्ली : येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करा, नंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाही, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने एकप्रकारे लोकसभा निवडणुकांच्या घोषणांबाबत संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने नेमकं काय केले आहे? केंद्रीय निवडणूक आयोगने […]

28 फेब्रुवारीपर्यंतच बदल्या करा, निवडणूक आयोगाचे पत्र
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली : येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करा, नंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाही, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने एकप्रकारे लोकसभा निवडणुकांच्या घोषणांबाबत संकेत दिले आहेत.

निवडणूक आयोगाने नेमकं काय केले आहे?

केंद्रीय निवडणूक आयोगने देशभरातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवले आहे की, येत्या 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत सर्व बदल्या पूर्ण कराव्यात. कारण, 28 फेब्रुवारीनंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाहीत. तसेच, बदल्यांचे अहवाल निवडणूक आयोगने मागितले आहे.

वाचा — तयारीला लागा, लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सूत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, आता सरकारला फक्त एकच महिना काम करायला मिळणार आहे. लवकरच आचारसंहितेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

एकंदरीत केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणांचे संकेत दिले आहेत. आधीच देशभरात लोकसभा निवडणुकांसाठीचा प्रचार सुरु झाला आहे, विविध राजकीय पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत, अशा आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस प्रशासनाला पाठवलेल्या पत्रावरुन, लवकरच निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता बळावली आहे.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.