राज्यात खळबळ! एकच शिवसेना राहिली… खासदार फुटीनंतर अमित शाहांचे मोठे विधान
राज्यात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरुन वातावरण तापले असतानाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट आता एकच शिवसेना राहिली आहे असे म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. हे सहा खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले अमित शाह?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर महत्त्वाचे विधान केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांना “शिवसेना नेते” असे संबोधित केले आणि स्पष्ट केले की, आता शिवसेनेत कोणतेही गट उरलेली नाही. अमित शाह म्हणाले, “पूर्वी शिंदेंच्या पाठी शिवसेना शिंदे गट असं बोलावं लागायचं. आता कोणताही गट राहिला नाही. आता एकच शिवसेना राहिली आहे.” हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे.
२०२२ मध्ये झालेल्या शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुरुवातीला ‘शिवसेना शिंदे गट’ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘ठाकरे शिवसेना गट’ असे संबोधले जात होते. आता अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे गटाची शिवसेने शिल्लक राहणार असल्याचे संकेत आहेत.
अंबाबई मंदिराचा निकाल
भाषणात बोलताना अमित शाह यांनी अंबाबई मंदिराचा जीर्णोद्धार करणार असल्याचे सांगितले. ‘जिथे माता अंबाबाई शेकडो वर्षापासून वास करतेय तिथे महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार करत आहे. त्यामुळे देशभरातील भक्तांना त्याचा प्रचंड आनंद आहे. सातव्या शतकात आकार घेतलेले मंदिर पुन्हा एकदा भक्तांच्या स्वागतासाठी उभे राहणार आहे. 41 मंदिराचे संरक्षण करुन हा जीर्णोद्धार करणार आहे. AI कॅमेरा, हेरिटेज वाल, साउंड अँड लाईट शो आशा अनेक विविध सोयीनी या मंदिराचा जीर्णोद्धार 6 महिन्यात होणार आहे. 1500 कोटी काही मोठी गोष्ट नाही. जिथे आपला धर्म, संस्कार घट्ट धरून ठेवला गेला त्यासाठी ही रक्कम मोठी नाही. आम्ही लहान असताना राम मंदिर निर्माणसाठी आम्ही गावोगावी फिरत होते. त्यावेळी लोकं म्हणायचे मंदिर आपल्याला पाहायला मिळत नाही. आम्हालाही तसे वाटायचे. पण ही रामाची इच्छा होती की 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि त्यानंतर राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली’ असे ते म्हणाले.
मोदीजींनी रेकॉर्ड बनवला की देशातील सर्वाधिक जास्त काळ पंतप्रधान म्हणून कार्यरत असल्याचा. या 12 वर्षात सोमनाथ ते गंगासागर आणि संपूर्ण देशात एनडीएचे शासन करत आहेत. आम्हाला म्हणायचे सगळीकडे जाऊ शकता पण पश्चिम बंगालमध्ये कसे पोहोचणार. पण आम्ही पश्चिम बंगालमध्ये पण सत्ता आणली. मी शब्द देतो की बंगाल मधून एक एक घुसखोरांना बाहेर काढतो असे अमित शाह पुढे म्हणाले.