AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांनी मैदान जिंकलं, तुम्ही मैदान सोडून पळाले, एकनाथ शिंदेंना थेट आहेर कुणाचा?

नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वाद सध्या विकोपाला गेलाय. यावर अरविंद सावंतांनी बोलणं टाळलं. संपलेल्या लोकांबद्दल काय बोलायचं, असा टोला अरविंद सावंतांनी दिला.

त्यांनी मैदान जिंकलं, तुम्ही मैदान सोडून पळाले, एकनाथ शिंदेंना थेट आहेर कुणाचा?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2022 | 2:51 PM
Share

मुंबईः कालच्या भारत – पाकिस्तान (India-Pakistan) क्रिकेट मॅचवरून संपूर्ण भारतात दिवाळीच्या एक दिवस आधीच जल्लोष साजरा झाला. ठिकठिकाणी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा झाला. यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आज तुफान टोलेबाजी केली. काल टीम इंडियाने एक मॅच जिंकली तशीच मॅच आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकली असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं.यावरून शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सणकून टीका केली आहे.

आपली तुलना भारताच्या खेळाडूंशी करायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांनी मॅच जिंकून देशाचा गौरव वाढवला. तुम्ही गद्दारी केली… अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

या गद्दारीचा तुम्हाला अभिमान वाटतो. ते मैदानात खेळले. मैदानात जिंकले. तुमच्यासारखे मैदान सोडून पळाले नाहीत, अशी खोचक टीका अरविंद सावंतांनी केली.

उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. यावरून नवनीत राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे शेतावर नाही तर बांधापर्यंत पोहोचले. तिथेच पत्रकार परिषद घेतली, असं राणा म्हणाल्या. त्यावर अरविंद सावंतांनी संताप व्यक्त केला. लायकी नसलेल्या माणसानं न बोलणं बरं आहे. उद्धव साहेबांचं नाव घ्यायची त्यांची लायकी नाही, असं सावंत म्हणाले.

रामदास कदम यांच्यासह अनेक भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा दौरा नाटकी असल्याची टीका केलीय. यावर अरविंद सावंत म्हणाले, ‘ भाजपा आयुष्य भर नौटंकी करत आहे. .. देशात नौटंकी भाजपाने पेरली आहे. आम्हाला जमत नाही… आम्ही बाळासाहेबांचे शिव सैनिक आहोत. आम्ही नौटंकी करत नाही…

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले, ‘ दोन वर्ष कोरोना होता. पंतप्रधानांनी काय केलं? लॉक डाऊन कोणी जाहीर केलं? उद्धवजींनी सर्व धर्मांसाठी केलं होतं.. फक्त एकासाठी नाही. फक्त मंदिर बंद न होता मशीद चर्च सर्वकाही बंद होता… पण भाजपने फक्त भ्रम निर्माण करायचे प्रयत्न केले.

नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव हा वाद सध्या विकोपाला गेलाय. यावर अरविंद सावंतांनी बोलणं टाळलं. संपलेल्या लोकांबद्दल काय बोलायचं, असा टोला अरविंद सावंतांनी दिला.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.