AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा आता तरी विकणे बंद कर; भास्कर जाधवांचा मोदींना टोला

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. महागाई आणि नोटबंदीच्या मुद्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

राजा आता तरी विकणे बंद कर; भास्कर जाधवांचा मोदींना टोला
भास्कर जाधव
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 8:05 AM
Share

रत्नागिरी – शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. महागाई आणि नोटबंदीच्या मुद्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काही केले आहे का? असे मोदींनी 2014 साली विचारले होते. तेव्हा लोकही म्हणाले होते काहीच केले नाही, आणि जनतेने मोदींना पंतप्रधान केले. मात्र देशाची सत्ता हाती येताच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशातील एक-एक गोष्ट हळूहळू विकायला सुरुवात केली आहे. लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्यांनी देश विकायला कढला. आता लोकही त्यांना म्हणतात राजा विकणं बंद  कर. भाजपापेक्षा काँग्रेस बरे होते अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचे  जाधव म्हणाले.

महागाईमुळे कबरडे मोडले 

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींचा आवाज काढत त्यांची मिमिक्री देखील केली. यावेळी उपस्थितांना हसू अनावर झाले. महागाईच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजपावर टीका केली. 2014 साली महागाईवर भाजपाने रान उठवले होते. ते आपले मुद्दे आक्रमकपणे मांडत होते. याच मुद्द्यावरून त्यांची सत्ता आली, मात्र आता सध्याची परिस्थिती काय आहे? महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. लोकांना गॅस घेणे परवडत नाही. मोदींनी उज्वला योजना आणली लोकांना वाटले फूकट मिळाले आहे, त्यामुळे अनेकांनी गॅस कनेक्शन घेतले. मात्र आता सरकारने सबसीडी बंद केल्याने पुन्हा एकदा लोकांवर चूली पेटवण्याची वेळ आल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे.

नोटबंदीवरून टीका

नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. सर्व कामधंदे सोडून बँकेत रागा लावाव्या लागल्या, या निर्णयाचा रोजगारावर देखील परिणाम झाला. मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नसल्याचेही जाधव म्हणाले.

संबंधित बातम्या 

VIDEO: राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांना तीन आशीर्वाद मागितले; या तीन गोष्टी कोणत्या?

पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.