AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा आता तरी विकणे बंद कर; भास्कर जाधवांचा मोदींना टोला

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. महागाई आणि नोटबंदीच्या मुद्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

राजा आता तरी विकणे बंद कर; भास्कर जाधवांचा मोदींना टोला
भास्कर जाधव
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 8:05 AM
Share

रत्नागिरी – शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. महागाई आणि नोटबंदीच्या मुद्यावरून त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काही केले आहे का? असे मोदींनी 2014 साली विचारले होते. तेव्हा लोकही म्हणाले होते काहीच केले नाही, आणि जनतेने मोदींना पंतप्रधान केले. मात्र देशाची सत्ता हाती येताच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशातील एक-एक गोष्ट हळूहळू विकायला सुरुवात केली आहे. लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्यांनी देश विकायला कढला. आता लोकही त्यांना म्हणतात राजा विकणं बंद  कर. भाजपापेक्षा काँग्रेस बरे होते अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचे  जाधव म्हणाले.

महागाईमुळे कबरडे मोडले 

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींचा आवाज काढत त्यांची मिमिक्री देखील केली. यावेळी उपस्थितांना हसू अनावर झाले. महागाईच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजपावर टीका केली. 2014 साली महागाईवर भाजपाने रान उठवले होते. ते आपले मुद्दे आक्रमकपणे मांडत होते. याच मुद्द्यावरून त्यांची सत्ता आली, मात्र आता सध्याची परिस्थिती काय आहे? महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. लोकांना गॅस घेणे परवडत नाही. मोदींनी उज्वला योजना आणली लोकांना वाटले फूकट मिळाले आहे, त्यामुळे अनेकांनी गॅस कनेक्शन घेतले. मात्र आता सरकारने सबसीडी बंद केल्याने पुन्हा एकदा लोकांवर चूली पेटवण्याची वेळ आल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे.

नोटबंदीवरून टीका

नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. सर्व कामधंदे सोडून बँकेत रागा लावाव्या लागल्या, या निर्णयाचा रोजगारावर देखील परिणाम झाला. मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागले नसल्याचेही जाधव म्हणाले.

संबंधित बातम्या 

VIDEO: राज्य शासनाचा जीआर अमान्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम; संप अधिक चिघळण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांना तीन आशीर्वाद मागितले; या तीन गोष्टी कोणत्या?

पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.