AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar | महाराष्ट्रात महिला मंत्री नाही, पण बिहारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या तीन महिला कोण?

बिहारमध्ये महाआघाडी अंतर्गत 31 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात तेजस्वी यादवांच्या राजद पक्षाकडे सर्वाधिक 16 आमदारांना मंत्रिपद मिळाले. तर जदयूच्या 11 आमदारांनी शपथ घेतली.

Bihar | महाराष्ट्रात महिला मंत्री नाही, पण बिहारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवलेल्या तीन महिला कोण?
लेशी सिंग, अनिता सिंग, शीला कुमारीImage Credit source: social media
| Updated on: Aug 17, 2022 | 6:20 AM
Share

पाटणाः महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) उलथापालथ झाली. एकिकडे महाराष्ट्रात भाजपच्या साथीने सरकार पाडलं गेलं तर दुसरीकडे भाजपला सोडचिठ्ठी देत बिहारमध्ये सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात सरकार (Maharashtra government) स्थापन झाल्यानंतर जवळपास 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र बिहारमध्ये सरकार स्थापनेनंतर आठवडाभरातच मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंगळवारी बिहारमध्ये विविध आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची (Cabinet Ministers) शपथ घेतली. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली, पण त्यात एकाही महिलेचा समावेश नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. बिहारच्या मंत्रिमंडळाचा विचार करता येथे 3 महिला आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या तीन महिला नेमक्या कोण आहेत हे पाहुयात?

लेशी सिंग

पतीच्या हत्येनंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या लेशी सिंग यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बूटन सिंग हे लेशी सिंग यांचे पती. 2000 साली त्यांची हत्या झाली होती. त्यानंतर लेशी सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूकही जिंकली. त्यानंतर त्या सलग तीन वेळा आमदार झाल्या. पतीच्या खून्यांची हत्या करण्याचा कट त्यांनी रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता. नितीश कुमारांसोबत त्या समता पार्टीत असल्यापासून आहेत. आता विद्यमान नितीश सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

अनिता देवी

बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील नोखा येथील आमदार अनिता देवी. तीन वेळा आमदारकी भूषवली. महाआघाडीच्या सरकारमध्येही त्या मंत्री होत्या. राबडी देवींच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. बिहार सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

शीला कुमारी

शीला कुमारी या फुलपरास येथील आमदार आहेत. 2022 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे प्रभावी नेता कृपानाथ पाठक यांना पराभूत करत १० हजार ९६६ मतांच्या फरकाने विजयी झाल्या. त्यानंतर NDA सरकारमध्ये मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले होते. आता नव्या सरकारमध्ये पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली असून नितीश कुमारांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

बिहारमध्ये राजद, जदयूचे किती मंत्री?

बिहारमध्ये महाआघाडी अंतर्गत 31 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यात तेजस्वी यादवांच्या राजद पक्षाकडे सर्वाधिक 16 आमदारांना मंत्रिपद मिळाले. तर जदयूच्या 11 आमदारांनी शपथ घेतली. काँग्रेसमधून 2, हमचा एक आणि अपक्ष 1 अशा आमदारांनी शपथ घेतली. तेजस्वी यादव यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आले आहे. तर तेज प्रताप यांना पर्यावरण मंत्रालय देण्यात आले आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.