कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही : आशिष शेलार

कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (BJP Ashish Shelar Answer Sanjay Raut)

कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही : आशिष शेलार
Sanjay Raut Ashish Shelar
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 11:55 AM

मुंबई : कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारचाही जोरदार समचार घेतला. (BJP Ashish Shelar Answer Sanjay Raut)

बाकी ठिकाणी गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?

शिवजन्मोत्सव हा दिवाळी सणासारखा एक मोठा उत्सव आहे. सरकारने कोरोनासंदर्भात योग्य ती काळजी घ्यायला हवीच मात्र शिवभक्तांचा उत्साह देखील लक्षात घ्यावा. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी चालते मग शिवजन्मोत्सावर निर्बंध का?, असा सवाल शेलार यांनी सरकारला विचारला.

आशिष शेलारांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं शेलार म्हणाले.

अजितदादांना क्लिनचिट म्हणजे आळी मिळी गुपचिळीचा हा प्रकार

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “अजित पवारांना क्लिनचिट म्हणजे आळी मिळी गुपचिळीचा हा प्रकार आहे. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अश्या पद्धतीने कारभार सुरू आहे हे सगळ्यांना माहितीय”

भाई जगताप आणि आशिष शेलार शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला एकत्र

राजकारण बाजूला ठेवून आशिष शेलार आणि मी आज एकत्र आज या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. इथे कोणत्याही राजकारणाचा लवलेश सापडत नाही. संपूर्ण देशभरात शिवजयंतीचा उत्साह आहे. सगळ्या धर्माच्या पंतांच्या लोकांना एकत्र आणण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

(BJP Ashish Shelar Answer Sanjay Raut)

हे ही वाचा :

विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं; महाराष्ट्रातही तसंच होईल: संजय राऊत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.