AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

मुंबई : भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीतून भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच डच्चू दिला आहे. अडवाणी यांचं नुसतं नाव यादीतून वगळलं नाही, तर अडवाणी ज्या मतदारसंघातून लढतात, त्या गांधीनगरमधून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे वय 91 वर्ष झाल्याने त्यांना तिकीट न दिल्याची चर्चा […]

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून 'या' बड्या नेत्याला संधी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM
Share

मुंबई : भाजपने 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीतून भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाच डच्चू दिला आहे. अडवाणी यांचं नुसतं नाव यादीतून वगळलं नाही, तर अडवाणी ज्या मतदारसंघातून लढतात, त्या गांधीनगरमधून भाजपाध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांचे वय 91 वर्ष झाल्याने त्यांना तिकीट न दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. देशाचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी सलग 6 वेळा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. 1980 च्या दशकात तसेच 1990 च्या दशकात भाजपला देशभरात वाढवण्याचे श्रेय लालकृष्ण अडवाणी यांना दिले जाते.

1984 मध्ये भाजपला दोन जागांवरुन 180 जागांपर्यंत पोहोचवणारे लालकृष्ण अडवाणी आता भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्येही नाहीत. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांचे पक्षातील अनेकांसोबत वाद झाले होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांचे तिकीट कापल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही भापजने विद्यमान खासदार दिलीप गांधी आणि सुनिल गायकवाड या दोघांचे तिकीट कापले आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र

नागपूर – नितीन गडकरी नंदुरबार – हिना गावित धुळे – सुभाष भामरे रावेर – रक्षा खडसे अकोला – संजय धोत्रे वर्धा – रामदास तडस चिमूर-गडचिरोली – अशोक नेते जालना – रावसाहेब दानवे भिवंडी – कपिल पाटील उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन नगर – सुजय विखे बीड – डॉ. प्रीतम मुंडे लातूर – सुधाकरराव श्रंगारे सांगली – संजयकाका पाटील चंद्रपूर – हंसराज अहीर

महत्त्वाची नावं :

वाराणसी – नरेंद्र मोदी गांधीनगर – अमित शाह लखनौ – राजनाथ बागपत – सत्यपाल सिंग गाझियाबाद – व्ही के सिंग मथुरा – हेमा मालिनी उन्नाव – साक्षी महाराज अमेठी – स्मृती इराणी जयपुर ग्रामीण – राज्यवर्धन सिंह राठोड

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली