AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का? मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पक्ष आणि शरद पवारांना न सोडण्याच्या दिलेल्या शपथेवरुन टीकास्त्र सोडलं.

शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का? मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला
| Updated on: Aug 02, 2019 | 10:26 AM
Share

वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “काही पक्षांची अवस्था अशी झाली आहे की त्या पक्षात कुणी राहायला तयार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना शपथ दिली जात आहे, पण ते तरी राहतील का हा प्रश्न आहे”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्ध्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना पक्ष आणि शरद पवारांना न सोडण्याच्या दिलेल्या शपथेवरुन टीकास्त्र सोडलं.

आमच्याकडे लिमिटेड जागा

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजपमध्ये अनेक लोक येत आहेत, मात्र आम्ही सर्वांनाच घेऊ शकत नाही, काहींना घेऊ. आमच्याकडे लिमिटेड जागा आहेत. काही जण येऊ शकतात पण फार नाही”

EVM ला दोष का?

विरोधी पक्षांनी आज ईव्हीएमविरोधात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, “विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन केलं तर उत्तर मिळेल. EVM काही आता आलेलं नाही. ईव्हीएमच्या जोरावर विरोधकांनी सर्वत्र राज्य केलं आहे, मग आताच आंदोलन आणि आक्षेप का?”

महाजनादेश यात्रेतून नागरिकांशी संवाद

महाजनादेश यात्रा ही सरकारची नाही तर भाजपची आहे. या यात्रेतून जनतेशी संवाद साधत आहे. केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे युतीला अभूतपूर्व यश मिळेल. विदर्भातून यात्रा सुरु केलीय. जो बॅकलॉग होता तो भरून काढलाय. ते मी जनतेला सांगतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य दुष्काळमुक्त करणार

महाजनादेश यात्रेला जनतेचे प्रचंड समर्थन मिळत आहे. पाच वर्षात केलेल्या कामांची ही पावती आहे. गेल्या पाच वर्षात प्रचंड कामे केली. पुढच्या पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे लक्ष्य आहे. पुढील 5 वर्षात राज्य दुष्काळमुक्त करणार, तेलंगणाला वाहून जाणारं 100 TMC पाणी वापरता येईल, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फायदा होणार, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...