AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | मूठभर लोकच श्रीमंत, मोठा वर्ग गरीबीच्या खाईत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे गणरायासमोर सवाल

काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार हे निश्चित. मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय.

Nana Patole | मूठभर लोकच श्रीमंत, मोठा वर्ग गरीबीच्या खाईत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे गणरायासमोर सवाल
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 31, 2022 | 2:35 PM
Share

मुंबईः देशातील मूठभर लोकच श्रीमंत होत आहेत तर एक मोठा वर्ग गरीबीच्या खाईत लोटला जातोय. यासाठी जे जबाबदार आहेत. देशातील महागाई, बेरोजगारीसाठी जबाबदार असणाऱ्यांना गणराय चांगली बुद्धी देवो, हीच आजच्या दिवशी प्रार्थना आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलंय. देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा प्रवाह नेण्याची काँग्रेसची (Congress) योजना होती. मात्र मागील सात आठ वर्षात ती खंडित झाली, त्यामुळेच हे हाल झाले आहेत. यासाठी जबाबदार कोण आहे, त्याचं नाव मी आज घेणार नाही, कारण आजच्या दिवशी राजकारण (Politics) नको, अशी माझी भूमिका असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. नाना पटोले यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता आणि तो राहणार असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

गरीब-श्रीमंतीवर काय म्हणाले पटोले?

देशातील गरीब-श्रीमंतीतील दरीवर बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘ जगात श्रीमंत भारतातला एक माणूस होतोय. गरीब-श्रीमंतातली दरी कुणामुळे होतेय, हे सर्वांना माहिती आहे. आज गणेशोत्सवामुळे मी बोलत नाही. उगाच त्याला राजकीय वळण मिळेल. पण मला जे बोलायचं ते लोकांना समजलं. शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात संविधानात आणायची संकल्पना आपण मांडली होती. तो प्रवाह थांबलाय. मूठभर लोकच आज श्रीमंत व्हायला निघालीत. देशातले मोठ्या प्रमाणावर लोक गरीब व्हायला निघालेत. सध्याची कृत्रिम महागाई ज्यांनी वाढवली आहे, त्यांना गणराय सद्बुद्धी देवो, एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करतो.

गुवाहटीतला तमाशा सर्वांनाच माहितीय…

महाराष्ट्रातील सत्ताकारणावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, गोवाहटीत काय तमाशा झालाय हे सर्वांनाच माहिती आहे. हे नेते सध्या सत्ता एंजॉय करतायत. पण नेमकं प्रदुषण कुणी केलं हेही अनेकांना ठाऊक आहे..

‘डोकी फिरवून कमजोर करण्याचा प्रयत्न’

काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार हे निश्चित. मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केलाय. पण आगामी निवडणुकात आमचा पक्षच मोठा हे सिद्ध होईल. आगामी स्थानिक निवडणूका स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन लढू. केंद्र सरकारने तरुण, शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग झाल्याय . राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसा नाही, आणि वेगवेगळ्या कामात खर्च केलाय. या सरकारने मराठा तरुणांसाठी नोकरी बाबात जे धोरण स्वीकारलं, त्याला विरोध नाही. पण त्यासाठी वेगळा निधी द्यावा, अशी मागणी नाना पटोलेंनी केली. तर आगामी काळातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......