AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत फडणवीसांचा नवा विक्रम

मुंबई : महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मुख्यमंत्रिपद सर्वाधिक भूषवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांना वगळता महाराष्ट्रात झालेल्या आधीच्या सर्व मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाची 1 हजार 498 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करत, वसंतराव नाईकांनंतर […]

महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत फडणवीसांचा नवा विक्रम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकत, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मुख्यमंत्रिपद सर्वाधिक भूषवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांना वगळता महाराष्ट्रात झालेल्या आधीच्या सर्व मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी मुख्यमंत्रिपदाची 1 हजार 498 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण करत, वसंतराव नाईकांनंतर सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नोंदवला.

वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेच्या काळात वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून तब्बल 11 वर्षे 77 दिवस राज्याचा गाडा हाकला. 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकूण तीनवेळा वसंतरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

  • मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ – 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967
  • मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ – 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972
  • मुख्यमंत्रिपदाचा तिसरा कार्यकाळ – 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975

देवेंद्र फडणवीसांनी 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं!

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात एकूण 17 मुख्यमंत्री झाले, आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 18 वे मुख्यमंत्री आहेत. यापैकी आतापर्यंत दिवंगत वसंतराव नाईक हे सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या खालोखाल दिवंगत विलासराव देशमुख हे होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतरावांना वगळता इतर 16 मुख्यमंत्र्यांना मागे टाकलं आणि दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे.

सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहणारे पाच मुख्यमंत्री!

  • वसंतराव नाईक – सलग 4 हजार 97 दिवस मुख्यमंत्री
  • देवेंद्र फडणवीस – सलग 1 हजार 498 दिवस मुख्यमंत्री
  • विलासराव देशमुख – सलग 1 हजार 494 दिवस मुख्यमंत्री
  • मनोहर जोशी – सलग 1 हजार 419 दिवस मुख्यमंत्री
  • शरद पवार – सलग 1 हजार 98 दिवस मुख्यमंत्री

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक