Devendra Fadnavis : ‘चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय देखील मुंबईकरच’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 15, 2022 | 9:01 PM

ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगिकारली आहे. असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis : चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय देखील मुंबईकरच, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर उत्तर भारतीय मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केलंय. ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या (North Indian People) तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगिकारली आहे. असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. वांद्रे पूर्व येथे हे नव्याने बांधण्यात आलेल्या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसचे उद्घाटन त्यांनी केले. मुंबईत टाटा कॅन्सर रूग्णालय येथे उपचारासाठी देशभरातून येणाऱ्या कर्करोग रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे अनेकांना याचा फायदा होईल तसेच दिलासाही मिळेल, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी वडिलांबद्दलचा अनुभव सांगितला

देवेंद्र फडणवीस यांनी आपला अनुभवही सांगितला. आपल्या वडिलांना कर्करोगाच्या उपचारासाठी नेतानाचा अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना तसेच रूग्णांनाही रस्त्यावर राहताना पाहिले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची गरज आणि मागणी लक्षात घेता या बाबु आरएन सिंह गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची तसेच अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात अशी ही व्यवस्था गेस्ट हाऊसच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. रूग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या हस्ते अतिथीगृहाचं उद्घाटन

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी अतिथीगृह आणि जेवणाची व्यवस्था

उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी सांगितले की, ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’ ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर  चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विषेश म्हणजे  उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागत आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल. या अतिथीगृहात परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे जेवणही मिळणार आहेत.

तसंच संघाकडून नव्याने बांधण्यात आलेला विवाहगृह  एमएमआर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या उत्तर भारतीय कुटुंबांसाठी परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच संघाचे सामूहिक विवाह समारोह आयोजित करण्याची योजना आहे. यामध्ये 8 उत्तर भारतीय जोड्या असतील तर दोन मराठी जोड्या असतील, असंही ते सिंह म्हणाले.

इतर बातम्या :

Mosque Loudspeaker Crisis : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’, मुंब्रातील PFI चा मनसेला इशारा; तर महाराष्ट्रभर तांडव करु, मनसेचं प्रत्युत्तर

Nana Patole on RSS : देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?, सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा सवाल