AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच- शरद पवार

Sharad Pawar on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच आहे, असं शरद पवार म्हणालेत. शासन आपल्या दारी योजनेचा वापर प्रसिद्धीसाठी नको. तर शेतकऱ्यांसाठी करा. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका, असं म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच- शरद पवार
| Updated on: Sep 05, 2023 | 1:03 PM
Share

जळगाव | 05 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तसंच पोलिसांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. या सगळ्याचे राज्यभर पडसाद उमटले. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या घटनेतचा निषेध करण्यात आला. यानंतर ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. यावर राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणं आहे, असं शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माफी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठा समाजाची जाहीर माफी मागितली आहे. 2014 लाही युतीचं सरकार सत्तेत होतं. यावेळी आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाने पाच हजार आंदोलनं केली. त्यावेळी कधीच बळाचा वापर केला नाही. पण आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत. त्यांची मी क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणावर पवार म्हणतात…

मागच्या अनेक वर्षांपासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजतही आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोक आहेत. त्यामुळे आरक्षण दिलं जावं, अशी मागणी होत आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीबांवर अन्याय होईल. 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

जालन्यात मराठा आंदोलकावंर जो लाठीचार्ज झाला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. तसंच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत विरोधकांना चॅलेंज दिलं. आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं अजित पवार म्हणाले. त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसतं. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.