AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम कोणाच्या मालकीचा नाही, जितेंद्र आव्हाडांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

ज्यांना रामाच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यांचे हे धंदे आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही असेही जितेंद्र आव्हाड (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) म्हणाले.

राम कोणाच्या मालकीचा नाही, जितेंद्र आव्हाडांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
| Updated on: Jan 25, 2020 | 3:03 PM
Share

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) आहे. यावरुन अनेकांकडून टीका केली जात असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. “राम हा कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरे यांची श्रद्धा रामावर आहे. तर त्यात चुकीचे काय? त्याचा सरकारशी काय संबंध?” असा प्रश्नही आव्हाडांनी उपस्थित केला.

“राम ही श्रद्धा आहे. मी खंडोबा, कोलकातामधील दुर्गा मातेच्या मंदिरात जातो. तुळजापूर, नाशिकची शप्तश्रृंगीला जातो. देव हा एकच आहे. त्यामुळे ते रामाकडे गेलो तर काय फरक पडतो?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारला.

“राम हा कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरे यांची रामावर श्रद्धा आहे. तर त्यात चुकीचे काय? त्याच सरकारशी काय संबंध? उद्या मी जरी जायचं ठरवलं तर मला कोण अडवून शकतो? बघायला गेलो तर काही जण रामाला मानतात. दक्षिणमध्ये रावणाची पुजा होते हे श्रद्धास्थान आहे. मला वाटत नाही की त्यामध्ये राजकारण करावे. ज्यांना रामाच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यांचे हे धंदे आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही,” असेही जितेंद्र आव्हाड (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) म्हणाले.

“जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एवढी कडक पावले उचलली होती असं मला वाटत नाही. जेव्हा ते गृहमंत्री होते तेव्हा आणि त्यांच्याच पक्षातील सातत्याने बोलणारा जितेंद्र आव्हाड यांना कधीच जयंत पाटील यांनी अडवले नाही. 2007 मध्ये मी सांगलीत गेलो होतो. धर्मनिरपेक्षवर भाषण करायला सांगितल्यावर व्याख्यानात मी भिडे गुरुजी बाबत जे बोलायचे होतो ते बोललो होतो. विशेष म्हणजे हे व्याख्यान जयंत पाटील यांनीच ठेवले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय करतात. त्याबाबत मला काही बोलायचे नाही,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“राज्य सरकारच्या अधिकारावरती केंद्र सरकार गदा आणून संविधान अपमानित करीत आहे. हे योग्य नाही. सरकार हे उद्धव ठाकरेंच नाही, शरद पवारांचं नाही, तर हे 12 कोटी जनतेचे आहे. या 12 कोटी मराठी मनांच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम केंद्र सरकार करत असून ते योग्य (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) नाही,” अशी टीकाही आव्हाडांनी केंद्र सरकारवर केली.

Follow Us
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे