AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर आरोपीला किती शिक्षा होते? जाणून घ्या सविस्तर

विनयभंग केल्याचा गुन्हा कोणत्या कलमाखाली दाखल होतो? त्यात शिक्षेची तरतूद किती? वाचा

विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर आरोपीला किती शिक्षा होते? जाणून घ्या सविस्तर
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 14, 2022 | 10:52 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा (Molestation case) दाखल झाला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. विनयभंगाचा गुन्हा नेमका कोणत्या कोणत्या कलमाखाली (IPC) दाखल होऊ शकतो? हा गुन्हा सिद्ध झाला, तर शिक्षा किती होते? या गुन्ह्यात जामीन मिळतो का? लगेच अटक होते का? असेही अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत. यामुळे विनयभंगाचा गुन्हा म्हणजे नेमकं काय आणि या गुन्ह्यामध्ये कोणत्या कलमांखाली किती शिक्षेची तरतूद आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आव्हाडांवर कोणत्या कलमाखाली गुन्हा?

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354 कलमाखाली विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आता पुढील कारवाई केली जाते आहे.

महत्त्वाचं म्हणजे विनयभंग प्रकरणी फक्त 354च नव्हे तर अन्यही काही कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याचे काही प्रकराही भारतीय दंड संहितेत नमूद करण्यात आलेले आहेत.

भारतीय दंड संहितेत कलम 349 ते 358 हे विनयभंग गुन्ह्याशी संबंधित आहे. यातील 354 कलमाखाली जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं.

स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.

समाजात स्त्रियांशी नैतिक आणि सभ्य वर्तन प्रत्येकानं करावं आणि तसं वर्तन जर केलं जात नसेल, तर अशांविरोधाचत स्त्रियांना दाद मागता यावी, यासाठी कायद्याची मदत घेतली जाते. मात्र या कलमांचा दुरुपयोगही केला जाऊ शकते, अशीबी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.

विनयभंगाचा आरोप एखाद्या व्यक्तीवर करत पोलीस तक्रार केली गेली तर हा गुन्हा सिद्धही करावा लागतो. विशेष म्हणजे विनयभंगाचा प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवता येऊ शकत नाही. दरम्यान, हा दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरुपाचा गुन्हा आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला 2 वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

कोणत्या गुन्हा केल्यास कोणतं कलम?

कलम 354 : एखाद्या स्त्रीला लाज वाटावी किंवा आक्षेपार्ह वाटावी अशा स्वरुपाची जबरदस्ती केल्यास कलम 354 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय दंडही आकारला जाऊ शकतो. दुसऱ्यावेळी या गुन्ह्यात दोषी आढळल्यात शिक्षेत पाच वर्षांपर्यंत वाढही होऊ शकते.

कलम 349 : एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती केली गेली, तर कलम 349 नुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

कलम 350 : गुन्हा करण्याच्या हेतून एखाद्या व्यक्तीने महिलेच्या परवानगीशिवाय तिच्यावर जबरदस्ती केली तर कलम 350 नुसार कारवाई केली जाऊ शकते.

कलम 351 : शब्दांसोबत शारीरिक हावभाव करत एखाद्या स्त्रिला लज्जा वाटावी, असं बोलणं किंवा कृती करणंही विनयभंग मानला जातो. त्यानुसार कलम 351 अन्वये कारवाई केली जाऊ शकते. वरील गुन्ह्यात 3 महिने कारावास आणि 100 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

कलम 353 : सरकार कामात व्यत्यय आणण्यासाठी कलम 353 चा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

कलम 355 : एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतून हल्ला करणं किंवा धमकी देणं

कलम 365 : मालमत्तेच्या चोरीप्रकरणी हल्ला करणं किंवा धमकावणं

कलम 357 : एखाद्याला बंदी बनवणयासाठी चुकीचा प्रयत्न करताना हल्ला करणं

कलम 358 : धमकी देऊन प्राणघातक हल्ला करणं

भारतात अनेकही महिला विनयभंग झाल्यानंतरही तक्रार दाखल करत नाही, असं जाणकार सांगतात. बदनामी होईल, न्यायालयीन प्रक्रियेची संथ गती, इत्यादी कारणांमुळे अनेकदा विनयभंग प्रकरणी तक्रार दाखल केली जात नाही, असंही सांगितलं जातं. दरम्यान, विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर महिलेला आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी साक्षीदार, पुरावे इत्याही महत्त्वपूर्ण गोष्टी कोर्टासमोर आणाव्या लागतात.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.