AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ठाकरे सरकारकडून विदर्भावर अन्याय, नागपूर पदवीधरमध्ये भाजपच जिंकणार”: चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर पदवीधरमध्ये भाजप जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. Bawankule on MLC Election

ठाकरे सरकारकडून विदर्भावर अन्याय, नागपूर पदवीधरमध्ये भाजपच जिंकणार: चंद्रशेखर बावनकुळे
chandrashekhar bawankule
| Updated on: Nov 13, 2020 | 7:45 PM
Share

गोंदिया: भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार असल्याने विदर्भावर अन्याय होत आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. विदर्भावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ( BJP leader Chandrashekhar Bawankule allegations on Thackeray Govt)

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. यामुळे राजकीय पक्षांनी प्रचारावर जोर लावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपनं नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना संधी दिली आहे. या पदवीधर मतदारसंघात मागील ५० वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा भाजपचं विजयी होणार असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.  भाजपनं नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे. काँग्रेस कडून अभिजित वंजारी यांना मिळाली आहे. (Chandrashekhar Bawankule allegations on Thackeray Govt)

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येत असल्याने विदर्भावर अन्याय होत आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने नेहमीच विदर्भावर अन्याय केला असून आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

भाजपकडून विधिमंडळ अधिवशेनावरुन सरकारवर टीकास्त्र

राज्य सरकारनं कोरोनाचं कारण देत विधिमंडळाचं अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायाचे राज्य सरकारकडून समर्थन करण्यात येत असले तरी भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांनीही सरकारवर विधिमंडळ अधिवेशनावरुन टीका केलीय.

राज्य सरकारची विधिमंडळ अधिवेशन घेण्याची मानसिकता नाही. भाजपला महाराष्ट्रातील अनेक प्रश्न अधिवेशनात मांडायचे आहेत. महिला अत्याचार , अतिवृष्टी, बेरोजगारी हे प्रश्न राज्यात आहेत. आम्हाला या प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणायची आहे, असंही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी नागपूरचे अधिवेशन हा कायदा आहे. त्यामुळे तिथे अधिवेशन झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. हिवाळी अधिवेशन रद्द केले असले तरी नागपूरला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्यावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊन विदर्भाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगतिले.

संबंधित बातम्या :

Nagpur | नागपूर विभाग पदवीधर निवडणूकची जबाबदारी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर

फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

(Chandrashekhar Bawankule allegations on Thackeray Govt)

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.