Raju Patil : ‘सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या…’, मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांच्यानंतर उदय सामंत शिवसेनेचे प्रमुख होतील अशी राजकारणात चर्चा रंगली आहे, त्यावर राजू पाटील यांनी आपलं मत मांडलं. "उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग आहे. मला नाही वाटत उदय सामंतजी या प्रकारे कुठलं राजकारण करतील"

Raju Patil : सेवा करायची की मेवा खायचा हे आमच्यासारख्या..., मनसेचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Eknath Shinde
| Updated on: Jan 21, 2025 | 12:36 PM

“गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे ही अपेक्षा होती. मात्र आगरी समाजाला ठेंगा दाखवत पालकमंत्री पद गेले. मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काही झालं नाही. आता पालकमंत्री झाले तर काय होणार?. आमच्या अपेक्षा होत्या, मात्र फक्त घोषणा झाल्या. यांना गडचिरोली, रायगड, पालघर या ठिकाणी पालकमंत्री पदाची गरज सेवा करण्यासाठी की मेवा खाण्यासाठी?. हे आमच्यासारख्या राजकारणी लोकांना माहित आहे” अशा शब्दात कल्याण ग्रामीणचे माजी मनसे आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. “पेरलेलं कधी कधी उगवतं. मात्र उदय सामंत हे इमानदारीत काम करणारे व्यक्ती. ते असं करणार नाही हा सर्व राजकारणाचा भाग” असं राजू पाटील म्हणाले.

ठाण्याच पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता मनसे आक्रमक झाली असून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. हे पद सेवेसाठी नाहीतर मेवा खाण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्री पद मिळावे, आणि ते असते तर आगरी समाजाला ही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती. त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेले आणि शेवटी मुख्यमंत्री असताना आमच्या भागात काय झाले नाही तर पालकमंत्री असताना काय होणारे?” अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

त्या रागापोटी हे ट्विट

“थोड्या आमच्या अपेक्षा होत्या. परंतु त्या पूर्ण झाल्या नाहीत. जसं धरण फक्त घोषणा झाली. मुख्यमंत्री असताना लँड एक्वेजीशन पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रागापोटी हे ट्विट केले आहे” असं राजू पाटील म्हणाले.

लोकांना ते माहित नाही

आमदार राजू पाटील म्हणाले की, “पालकमंत्री पद कुठलं पाहिजे, गडचिरोली, पालघर, रायगड. कारण रायगडला पोर्ट आहे, वाढवण बंदर येतय पालघरला. गडचिरोलीला खदानी आहेत, हे कशासाठी पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची की का मेवा खायचा हे आमच्यासारख्या राजकारणाला माहित आहे. लोकांना ते माहित नाही” अशा शब्दात राजू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला.