AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी मतदान मग लग्न, बोहल्यावर चढण्याआधीही नवरदेवाचे मतदान

वर्धा : लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतंच. मात्र, वर्ध्यातील तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. अल्लीपूर येथील एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं आहे. चेतन गोठे असे या युवकाचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे राहणारा चेतनचे  आज लग्न आहे. […]

आधी मतदान मग लग्न, बोहल्यावर चढण्याआधीही नवरदेवाचे मतदान
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

वर्धा : लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे म्हणून निवडणूक आयोग अभियान राबवतंच. मात्र, वर्ध्यातील तरुणाने अनोख्या प्रकारे मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. अल्लीपूर येथील एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं आहे. चेतन गोठे असे या युवकाचे नाव आहे.

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे राहणारा चेतनचे  आज लग्न आहे. लग्नाच्या दिवशी घाईगडबड असतानाही चेतनने सकाळी मतदान केंद्रावर जात मतदान केले. विशेष म्हणजे मतदान करताना त्याने नवरदेवाचा पोषाख घातला होता.  मतदान हे आपले कर्तव्य आहे.

प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते. त्यानुसार चेतननेही मतदान हे कर्तव्य समजत बोहल्यावर उभे चढण्यापूर्वी मतदान केल आहे. या मतदानानंतर त्याचे इतर गावात कौतुक होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून लोकांना मतदानाचे महत्त्व पटत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करायला पाहीजे असे मत चेतनने व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये, तर महाराष्ट्रात 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडेल. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विविध मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण पिढी, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध या सर्वांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यंदा पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचादेखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे.

पाहा व्हिडीओ:

संबंधित बातम्या :

LIVE : नितीन गडकरींनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नाही, मग हे करा…

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक