AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, राऊतांचं ट्विट; उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांची सुरतला जाऊन भेट घेतली होती. मात्र, शिंदे यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने, राऊतांचं ट्विट; उद्धव ठाकरे राजीनामा देणार?
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेनेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2022 | 12:02 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज दुपारीच राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या ट्विटनुसार विधानसभा बरखास्त झाल्यास मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा बरखास्तीची (vidhansabha) राज्यपालांना शिफारस केली तर ती स्वीकारायची की नाही हे राज्यपाल ठरवतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होणार की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देऊ शकेल असं सांगितलं जातं. त्यामुळे भाजपची पुन्हा एकदा सत्ता येऊ शकेल असं सांगितलं जात आहे. मात्र, राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे यांची सुरतला जाऊन भेट घेतली होती. मात्र, शिंदे यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आपल्याकडे 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्यात अधिवेशनाला सामोरे जाण्यापासून ते सरकार बरखास्त करण्यापर्यंतच्या विषयावर चर्चा झाली. शिंदे माघारी फिरायाला तयार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून एक प्रकारे आघाडीतील बैठकीतील निर्णयच जाहीर केल्याचं सांगितलं जात होतं.

आधीच संकेत दिले

राऊत यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सरकार बरखास्त करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. फार फार काय होईल सत्ता जाईल. पुन्हा सत्ता परत येईल. पण कोणीही मोठा नाही. पक्ष मोठा आहे. पक्ष हाच सर्वोच्च असतो, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या तासाभरातच राऊत यांनी ट्विट करून थेट मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडतील. आणि त्यानंतर राज्यपालांकडे आपला राजीनामा फॅक्सने पाठवतील, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.