AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण

हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवी देवतेला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवांना समर्पित आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Vastu Shastra : शनिवारच्या दिवशी करा हा सर्वात सोपा उपाय, सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून होईल तुमचं संरक्षण
shani devImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 9:52 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा शनी देवाला समर्पित आहे. शनी देवांना न्यायाची देवता असं देखील म्हटलं जातं. शनी देव हे कर्मफळ दाता आहेत. म्हणजेच ज्याचं जसं कर्म तसं फळ शनी देव देत असतात. शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला शनीदोष असेल तर या उपायांमुळे त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच शनिवारच्या दिवशी करण्याचे असे देखील काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमचं सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं? शनी देवांना न्यायाची देवता म्हटलं जातं, व्यक्तीचं जसं कर्म आहे, तसं फळ शनी देव देतात. म्हणून त्यांना कर्मफळ दाता असं देखील म्हटलं जातं. शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच शनी देवांना प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी सकाळी उठून स्नान करावं, त्यानंतर शनी मंदिरात जाऊन शनी देवांचं दर्शन घ्यावं. शनी मंत्राचा जाप करावा. तसेच शनी देवांना काळे तीळ आणि तेल अर्पण करावं. या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं, त्यांमुळे तुम्हाला शनी दोषातून मुक्ती मिळते.

दरम्यान अपाल्यासोबत अनेकदा असं होतं की आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्या कामात आपल्याला यश मिळत नाही. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टींची आपल्याला खूप भीती वाटू लागते. या सर्व गोष्टी तुमच्या घरात असलेल्या नकारात्मक शक्तींमुळे घडत असतात. अशा प्रकारची नकारात्माक शक्ती दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आप माहिती घेऊयात. शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडं लिंबू पिळा, तसेच थोडी हळद मिक्स करा. या पाण्यानं अंघोळ केल्यास तुमचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.