AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड

राज्यभरातील ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: सत्ताधारी शिवसेनेची राज्यभरात विजयी घौडदौड
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 18, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई : राज्यातील 12 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल हाती येत आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेची विजयी घौडदौड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ विरोधी पक्ष असलेला भाजपलाही अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज जसेजसे निकाल हाती येत आहेत, तसं शिवसेनेच्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतींची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा पहिला भगवा फडकल्याचं दिसून आलं.(Shiv Sena’s big victory in Gram Panchayat election results)

हातकणंगले मतदारसंघातील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीचे 13 पैकी 10 उमेदवार विजयी झाले आहेत. निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. तिकडे राधानगरी मतदारसंघातील बारवे गावात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाची सत्ता आली आहे. बारवे गावात आबिटकर गटाने 9 पैकी 6 जागा जिंकत विजय मिळवला आहे.

हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडीत भाजपला जोरदार धक्का देत शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. बिरदेववाडी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं 7 पैकी 6 जागा जिंकल्या आहेत. हा विजय मिळवून शिवसेनेनं भाजपची 40 वर्षाची परंपरा खंडीत केली आहे. तिकडे सोलापूरमधील नांदणी ग्रामपंचायतीवरही शिवसेनेचा विजय झाला आहे. एकूण 9 जागांपैकी 6 जागांवर विजय मिळवत शिवसेननं सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला 3 जागा मिळवण्यात यश आलं आहे.

कोरेगाव तालुक्यात शशिकांत शिंदेंना धक्का

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात महाविकास आघाडीतील सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं मोठा धक्का दिला आहे. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या 5 ग्रामपंचायती शिवसेनं खेचून आणल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळापूर, किन्हई पेठ, कटापूर, ल्हासुर्णे आणि देऊर या राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायती शिवसेनेनं खेचून आणल्या आहेत.

पाटण तालुक्यात शिवसेनेचा सर्वात मोठा विजय

शिवसेनेला सर्वात मोठा विजय सातारा जिल्ह्यात मिळताना पाहायला मिळत आहे. कारण सातऱ्यातील पाटण तालुक्यात आतापर्यंत 18 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारल्याची पाहायला मिळत आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील नागरिकांचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचा झटका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर या मूळ गावात शिवसेनेनं पाटलांना मोठा झटका दिला आहे. खानापूर गावातील 6 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचा इथं विजय झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Hatkanangale Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापुरात जनसुराज्यपाठोपाठ शिवसेनेची कमाल; मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

Gram Panchayat Election Results 2021 : माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा धुराळा, 3 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा

Shiv Sena’s big victory in Gram Panchayat election results

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी