AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48 प्रवासी घेऊन जाणारी बस कर्नाटक सीमेवर रोखली, सीमाप्रश्न पेटला, 2 राज्यांतील बस सेवा विस्कळीत, काय Updates?

शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सातारा बस स्थानकात आंदोलन करत कर्नाटक आगाराच्या बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहून निषेध केला .

48 प्रवासी घेऊन जाणारी बस कर्नाटक सीमेवर रोखली, सीमाप्रश्न पेटला,  2 राज्यांतील बस सेवा  विस्कळीत, काय Updates?
Image Credit source: social media
| Updated on: Nov 26, 2022 | 12:29 PM
Share

शंकर देवकुळे, सांगलीः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा (Maharashtra Karnataka Border issue) वाद चांगलाच उफाळून आलेला दिसतोय. आज अहमदनगरहून गाणगापूरकडे जाणाऱी एक बस सकाळीच रोखण्यात आली. बसमध्ये 48 प्रवासी होते. मात्र कर्नाटकच्या सीमेवर बसला थांबवण्यात आलं. यामुळे अनेक प्रवाशांचा ताटकळत बसावं लागलं. दोन्ही राज्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या बस (ST Bus) सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी सांगली, सोलापुरातील काही भागांवर दावा सांगितल्यामुळे महाराष्ट्रातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.

या मुद्द्यावरून वाढती आंदोलनं लक्षात घेता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी बसची सेवा तूर्तास बंद करण्यात आली होती. सांगली, सोलापूर, कोल्हापूरातील सीमांवरील स्थिती पाहता बससेवा काही काळ विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.  दोन्ही राज्यांतील तणावाचं वातावरण निवळेपर्यंत बससेवा विस्कळीत राहिल, अशी माहिती राज्य परिवहन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.

काल मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काही अज्ञातांनी एका बसवर दगडफेक केली होती. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटकने दावा सांगितलत्यामुळे दौंड येथे निषेध व्यक्त करण्यात आला. तेथे कर्नाटकच्या बसला काळे फासण्यात आले. तर कर्नाटकातील कलबुर्गी येथेही बसला काळे फासले गेले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र शासनाच्या बसेस शुक्रवारी संध्याकाळी काही काळ अडवण्यात आल्या. सोलापूरहून गाणगापूरला निघालेल्या महाराष्ट्र शासनाची एसटी बस अडवण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर या गावी बसेस अडविल्यात आल्या. मात्र काही काळाने बसेस सोडल्या. कोल्हापुरातील घटनांतर कर्नाटक अलर्ट मोडवर आले आहे.

शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने सातारा बस स्थानकात आंदोलन करत कर्नाटक आगाराच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून निषेध केला .. सातारा बस स्थानक परिसरात कर्नाटक आणि बेळगाव येथून येणाऱ्या सर्व बसेसवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहित आंदोलन केलं.. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा धिक्कार करत ‘मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई मुर्दाबाद शिवसेना जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला..

बुलढाणा येथे आज शिवसेना ठाकरे गटातर्फे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र सरकारच्या मवाळ धोरणावर उद्धव ठाकरे जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.