AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभवानंतर काँग्रेसमधील मतभेदांना ऊत, मुंबईतील बैठकीकडे दिग्गजांची पाठ

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील भीषण पराभवानंतरही काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गज उमेदवारांनी,  नेत्यांनी पाठ फिरवली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना बोलविलेल्या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर हे लोकसभा उमेदवार आलेच नाहीत. मुंबईत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई अध्यक्ष मिलिंद […]

पराभवानंतर काँग्रेसमधील मतभेदांना ऊत, मुंबईतील बैठकीकडे दिग्गजांची पाठ
| Updated on: May 25, 2019 | 10:35 AM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील भीषण पराभवानंतरही काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गज उमेदवारांनी,  नेत्यांनी पाठ फिरवली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना बोलविलेल्या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर हे लोकसभा उमेदवार आलेच नाहीत.

मुंबईत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीकडे पराभूत झालेल्या उमेदवारांनी पाठ फिरवली.  मात्र दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड हे एकमेव उमेदवार या बैठकीला हजर होते.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदी संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर संजय निरुपम नाराज होते. मात्र अन्य उमेदवारही पराभवातून अजून सावरलेले दिसत नसल्याचं चित्र आहे.

मुंबईतील सर्व जागा युतीकडे

मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो. विविध जाती-धर्म-भाषेचे लोक मुंबईत राहतात. त्यामुळे कुठलेही नेमके अंदाज बांधता येत नसलेल्या मुंबईत यंदाही प्रत्येक मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे तर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

संबंधित बातम्या

मुंबईतल्या सहाच्या सहा जागा युतीकडे, पाहा कुठल्या जागेवर कोण विजयी? 

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.