AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभवानंतर काँग्रेसमधील मतभेदांना ऊत, मुंबईतील बैठकीकडे दिग्गजांची पाठ

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील भीषण पराभवानंतरही काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गज उमेदवारांनी,  नेत्यांनी पाठ फिरवली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना बोलविलेल्या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर हे लोकसभा उमेदवार आलेच नाहीत. मुंबईत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई अध्यक्ष मिलिंद […]

पराभवानंतर काँग्रेसमधील मतभेदांना ऊत, मुंबईतील बैठकीकडे दिग्गजांची पाठ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 25, 2019 | 10:35 AM
Share

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील भीषण पराभवानंतरही काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गज उमेदवारांनी,  नेत्यांनी पाठ फिरवली.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना बोलविलेल्या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर हे लोकसभा उमेदवार आलेच नाहीत.

मुंबईत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीकडे पराभूत झालेल्या उमेदवारांनी पाठ फिरवली.  मात्र दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड हे एकमेव उमेदवार या बैठकीला हजर होते.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदी संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर संजय निरुपम नाराज होते. मात्र अन्य उमेदवारही पराभवातून अजून सावरलेले दिसत नसल्याचं चित्र आहे.

मुंबईतील सर्व जागा युतीकडे

मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो. विविध जाती-धर्म-भाषेचे लोक मुंबईत राहतात. त्यामुळे कुठलेही नेमके अंदाज बांधता येत नसलेल्या मुंबईत यंदाही प्रत्येक मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे तर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईत भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला.

संबंधित बातम्या

मुंबईतल्या सहाच्या सहा जागा युतीकडे, पाहा कुठल्या जागेवर कोण विजयी? 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली