महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाआघाडीत मनसेला 4 ते 5 जागा हव्या आहेत. त्यापैकी एक जागा मुंबईत हवी असल्याचं सांगण्यात येत आहे. ईशान्य मुंबई मतदार संघावर मनसेने दावा केला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या या मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. त्यांच्याविरोधात मनसेला निवडणूक लढवायची आहे. गेल्या निवडणुकीत […]

महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?
Follow us on

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाआघाडीत मनसेला 4 ते 5 जागा हव्या आहेत. त्यापैकी एक जागा मुंबईत हवी असल्याचं सांगण्यात येत आहे. ईशान्य मुंबई मतदार संघावर मनसेने दावा केला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या सध्या या मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. त्यांच्याविरोधात मनसेला निवडणूक लढवायची आहे. गेल्या निवडणुकीत आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती. मात्र महाआघाडीत घेतल्यास ही जागा मनसेला हवी आहे. मनसेकडून महेश मांजरेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवली होती.

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. महाराष्ट्रात तर नवं राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते.  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करुन येत्या लोकसभा निवडणुकींना सामोरं जाणार आहेत, हे एव्हाना निश्चित झाले आहे. या आघाडीत आता इतर मित्रपक्ष जोडण्यासही सुरुवात झाल्याचे दिसते आहे. त्यातूनच राज ठाकरे यांच्या मनसेचा पर्याय पुढे येत आहे.

मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध का?

उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तरभारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून 2009 च्या निवडणुकीत सोमय्या यांचा फक्त 2 हजार 399 मतांनी पराभव झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 5 लाख 25 हजार 285 मते मिळवून संजय पाटील यांच्यावर मात केली. ईशान्य मुंबईतल्या एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे.

संबंधित बातम्या 

ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान  

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…  

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न