AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mulayam Singh Yadav: ‘पैलवान’ ते यूपीचे मुख्यमंत्री, जाणून घ्या नेताजींची कारकीर्द

मुलायम सिंह यादव यांचं निधन झालंय. त्याच्या करिअरवर एक नजर टाकूया...

Mulayam Singh Yadav: 'पैलवान' ते यूपीचे मुख्यमंत्री, जाणून घ्या नेताजींची कारकीर्द
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 10, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई : मुलायम सिंह यादव अर्थात नेताजी… उत्तर प्रदेशच्या राजकारणातील महत्वाचा नेता… सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलायम सिंह (Mulayam Singh Yadav Passes Away) यांनी कधीकाळी पैलवान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. तेच नेताजी (Mulayam Singh Yadav) आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पुढे जाऊन देशाचे संरक्षण मंत्री झाले. यूपीसह देशाच्या राजकारणातही त्यांचं स्थान अढळ राहिलं. त्याचं करिअर जाणून घेऊयात…

1939 ला उत्तर प्रदेशमधल्या इटावा जिल्ह्यातील सैफई या गावात मुलायम सिंह यांचा जन्म झाला. त्याचे वडील सुघर सिंह आणि आई मारुतीदेवी हे दोघेही शेती करायचे.

सुघर सिंह यांची इच्छा होती की मुलायम सिंह यांनी पैलवान व्हावं. त्यासाठी त्यांना तसं प्रशिक्षणही देण्यात आलं. स्वत: मुलायम सिंह यांनाही कुस्तीची आवड होती. कुस्तीत आपल्या डावपेचामुळे प्रतिस्पर्ध्याला चितपट करायचे. याच डावपेचाचा त्यांनी राजकारणातही उपयोग केला आणि तीनदा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं.

राम मनोहर लोहिया यांनी नहर रेट आंदोलनाची घोषणा केली. यात मुलायम सिंहही सहभागी झाले. या आंदोलना दरम्यान लोहिया यांच्यासरह काही नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यात मुलायम सिंहदेखील होते. यावेळी त्यांचं वय अवघं 15 वर्षे होतं. तेव्हापासून लोहिया आणि त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. तिथून पुढे ते कायम राहिले.

मुलायम सिंह आठवेळा आमदार म्हणून निवडून आले. 1989 ला मुलायम सिंह पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. 1993 ला ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर 2003 ला तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

1995 ला ते देशाचे संरक्षण मंत्री झाले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायम सिंह यादव यांच्या नावाला वेगळं वलय आहे. आज त्यांच्या जाण्याने अवघं उत्तर प्रदेश हळहळलं आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल