AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवार यांचं भरपावसात उपोषण; म्हणाले, आता ‘हे’ काम झालं नाही तर…

Karjat Jamkhed MLA Rohit Pawar Request to Ajit Pawar : अजितदादा पवार, आपण लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा माझा मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!; रोहित पवार यांची मागणी

रोहित पवार यांचं भरपावसात उपोषण; म्हणाले, आता 'हे' काम झालं नाही तर...
| Updated on: Jul 24, 2023 | 12:37 PM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय. पण या अधिविशेन काळात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या एका कृतीने लक्ष वेधलं आहे. रोहित पवार विधिमंडळ आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक विनंतीही केली आहे.

कर्जत जामखेडमधील युवकांचा रोजगार आणि स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात उपोषण केलं आहे. कर्जत जामखेडमध्ये MIDC येणार आहे. मात्र आता तो प्रकल्प रोखण्यात आला आहे. पण आता MIDC ला मंजुरी मिळालीच पाहिजे. कर्जत जामखेडच्या तरूणांना रोजगार मिळालाच पाहिजे. कर्जत जामखेडच्या युवांवर आणि स्थानिक जनतेवर एमआयडीसीची मंजुरी रोखून अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असा फलक या उपोषणावेळी रोहित पवार यांच्याजवळ होता.

याचवेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितच पवार यांच्याकडे एक मागणी केली आहे. अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!, असं रोहित पवार म्हणालेत.

माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार!, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांकडे मागणी

याचवेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक मागणी केली आहे. अजितदादा धडाडीने निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच याकामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ आपला कायमस्वरूपी आभारी राहील!, असं रोहित पवार म्हणालेत.

आंदोलन मागे पण…

मी उपोषणाला बसलेलो असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते मला भेटायला आले. तसंच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील तिथं आले. त्यांनी मला शब्द दिला आहे. कर्जत-जामखेडच्या अधिसुचनेच्या बाबतीतील बैठक उद्या तातडीने घेतली जाईल. अधिवेशन संपण्याच्या आधी अधिसुचना काढली जाणार आहे. पुढच्या काहीच दिवसात एमआयडीसीच्या बाबतीतील जी प्रक्रिया आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार, असा शब्द सामंतजींनी दिला आहे, असं रोहित पवार म्हणाले.

युवकांसाठी करत असलेलं आंदोलन मी मागे घेत आहे. उद्या बैठक आहे. लवकरच अधिसूचना निघेल आणि एमआयडीसीचं काम होईल, असा विश्वास वाटतो. पण जर तसं झालं नाही तर माझ्या मतदारसंघातील हजारो युवक मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असं रोहित पवार म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.