AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर!; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut on Jalna Lathi Charge Sarathi Antarwali Maratha Samaj Andolan Violence : जालन्यातील लाठीचार्ज अन् सरकारच्या भूमिकेवर संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले हे तर जनरल डायरचं सरकार...; वाचा सविस्तर बातमी...

महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर!; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल
| Edited By: | Updated on: Sep 04, 2023 | 10:59 AM
Share

मुंबई | 04 सप्टेंबर 2023 : जालन्यात झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सध्या तीन-तीन जनरल डायर आहेत, असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात जनरल डायर कोण? हे महाराष्ट्रात सर्वांना समजलं आहे . महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. एक नाहीतर तीन-तीन जनरल डायर सध्या राज्यात आहेत. एक मुख्य जनरल डायर आणि दोन उप जनरल डायर. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्यकारभार सुरु आहे. जे विरोधात जातील. त्यांच्यावरती हल्ले करा. त्यांना गोळ्या मारा असा कारभार सध्या सुरू आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

तुम्ही संसदेत विशेष विधेयक आणता. दिल्ली सेवा बील पास करून घेता. आताही ऐन गणपतीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मग घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्नही सोडवता येऊ शकतो. मराठा आरक्षणासह अन्य आर्थिकदृष्या दुर्बल घटकांना आरक्षण देता येईल. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी घटना दुरूस्ती करता. मग महाराष्ट्रात एक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो. उपोषण करतो. त्यावर तुम्ही गोळ्या झाडता. महिलांची डोकी फोडता. मग घटना दुरुस्ती करून त्यांना न्याक का देत नाही? हा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

‘तो’ फोन नक्की कुणाचा?

जालन्यात मराठी बांधवांवर लाठीचार्ज झाला. लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना का घडली? तिथं लोकांवर हल्ला करण्याचे आदेश कुणा दिले? तो फोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून होता की गृहमंत्र्यांचा होता? या लाठीहल्ल्यात पोलिसांचा दोष नाहीये. आता या प्रकरणात पोलिसांचा बळी दिला जातोय. मात्र हे आदेश वरून आले होते. हे वरिष्ठांचे आदेश होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. शासन आपल्यादारी या कार्यक्रमात कुठल्या अडथळा येऊ नये, या जाब विचारू नये. यासाठी हे आंदोलन चिरडून टाका, असे आदेश वरून आले आणि पोलिसांनी त्यांचं पालन केलं, असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.