AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोके घेतल्याचं आमदारच मान्य करतात, ‘या’ माफीने वस्तुस्थिती बदलणार नाही, नाना पटोलेंचा आरोप काय?

'खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे' असा टोमणा नाना पटोले यांनी लगावला.

खोके घेतल्याचं आमदारच मान्य करतात, 'या' माफीने वस्तुस्थिती बदलणार नाही, नाना पटोलेंचा आरोप काय?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 31, 2022 | 12:42 PM
Share

मुंबईः बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्या वादानंतर रवी राणा यांनी माफी मागितली तरी वस्तुस्थिती बदलणार नाही. हे सरकारच भ्रष्टाचारासाठी आलेलं आहे. या पक्षाचे आमदाराच म्हणतात, पैसे घेऊन गुवाहटीला (Guwahati) गेलो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांनी खोके अर्थात पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावरून आमदार बच्चू कडू यांनी तीव्र भूमिका घेतली होती. फडणवीसांनी आम्हाला पैसे दिले असतील तर ते सिद्ध करावे अन्यथा रवी राणा यांनी माफी मागावी, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.

अन्यथा १ नोव्हेंबर रोजी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर हा वाद आता निवळण्याची चिन्ह आहेत.

आमदार रवी राणा काय म्हणाले?

रवी राणा यांनी माफी मागितली. मात्र कार्यकर्त्यांची चर्चा केल्यानंतर उद्या दुपारी भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

मात्र नाना पटोले यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी ५० खोके घेतलेत, हे त्यांचेच आमदार मान्य करतात. त्यामुळे खोके वाचवण्यासाठी त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. विरोधकांचे रक्षण करायला जनता सक्षम आहे, आमच्याबरोबर जनता आहे. पण त्यांनी घेतलेले खोके वाचवायला त्यांना सुरक्षा व्यवस्था दिली जाते, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, तुमच्या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार? तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना खाऊ देणार नाही, असे म्हणता, मात्र स्वतःच भ्रष्टाचार करतायत, त्याची चौकशी कोण करणार?

गुजरातमधील पूल दुर्घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, गुजरातमध्ये पूल पडला त्यात , ४०० लोकांचा मृत्यू झालाय, असा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमध्ये होते, तेथेही पूल पडला. हे अॅक्ट ऑफ गॉड नसून फ्रॉड आहे. तेच गुजरातमध्येही लागू होतं. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येतील…

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.