AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे-वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची, राणे-उदय सामंतांची मध्यस्थी

दीपक केसरकरांचा अभिनंदन ठराव वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडल्याने वादाला तोंड फुटलं.

नितेश राणे-वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची, राणे-उदय सामंतांची मध्यस्थी
| Updated on: Jan 21, 2020 | 3:09 PM
Share

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील नाईक आणि राणे कुटुंबातील वाद आज पुन्हा उफाळून आला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची (Nitesh Rane Vaibhav Naik Ruckus) झाली. खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा पडला.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या निमित्ताने आज नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर आले होते.

आमदार वैभव नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसंच पालकमंत्री उदय सामंत यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरवाला अनुमोदन दिलं.

शिवसेना नेते दीपक केसरकर पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी सिंधुदुर्गात आला. त्यामुळे केसरकरांचं अभिनंदन करावं, असा ठरावही वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडला.

सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणेंनी दीपक केसरकर यांना टार्गेट केलं. केसरकरांनी गेल्या पाच वर्षात विकासाचं राजकारण केल्याचा आरोप राणेंनी केला. केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरुन नियोजन सभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला.

नितेश राणे आणि वैभव नाईक हे भरसभेतच एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण (Nitesh Rane Vaibhav Naik Ruckus) झालं. मात्र नारायण राणे आणि उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणावर पडदा टाकला.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.