AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणे-वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची, राणे-उदय सामंतांची मध्यस्थी

दीपक केसरकरांचा अभिनंदन ठराव वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडल्याने वादाला तोंड फुटलं.

नितेश राणे-वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची, राणे-उदय सामंतांची मध्यस्थी
| Updated on: Jan 21, 2020 | 3:09 PM
Share

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील नाईक आणि राणे कुटुंबातील वाद आज पुन्हा उफाळून आला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत भाजप आमदार नितेश राणे आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यात भरसभेत बाचाबाची (Nitesh Rane Vaibhav Naik Ruckus) झाली. खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा पडला.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या निमित्ताने आज नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते दीपक केसरकर हे एकाच व्यासपीठावर आले होते.

आमदार वैभव नाईक यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसंच पालकमंत्री उदय सामंत यांच्याही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरवाला अनुमोदन दिलं.

शिवसेना नेते दीपक केसरकर पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी सिंधुदुर्गात आला. त्यामुळे केसरकरांचं अभिनंदन करावं, असा ठरावही वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीत मांडला.

सभेच्या सुरुवातीलाच नारायण राणेंनी दीपक केसरकर यांना टार्गेट केलं. केसरकरांनी गेल्या पाच वर्षात विकासाचं राजकारण केल्याचा आरोप राणेंनी केला. केसरकरांच्या अभिनंदन ठरावावरुन नियोजन सभेत दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घातला.

नितेश राणे आणि वैभव नाईक हे भरसभेतच एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण (Nitesh Rane Vaibhav Naik Ruckus) झालं. मात्र नारायण राणे आणि उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणावर पडदा टाकला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.