उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर

| Updated on: Sep 24, 2019 | 4:38 PM

उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर
Follow us on

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA candidate first list) विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर (VBA candidate first list) करण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

उमेदवारांची यादी 

  1. सुरेश जाधव, शिराळा
  2. डॉ. आनंद गुरव, करवीर
  3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर
  4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण
  5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव
  6. दीपक शामदिरे, कोथरुड
  7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर
  8. मिलिंद काची, कसबा पेठ
  9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी
  10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर
  11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव
  12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड (VBA candidate first list)
  13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा
  14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी
  15. अरविंद सांडेकर – चिमूर
  16. माधव कोहळे – राळेगाव
  17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव
  18. लालसू नागोटी – अहेरी
  19. मणियार राजासाब – लातूर शहर
  20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी
  21. अड आमोद बावने – वरोरा
  22. अशोक विजय गायकवाड – कोपरगाव

26 तारखेपर्यंत अंतिम यादी (VBA candidate first list)

विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचं काम सुरु असून पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना दिली होती.

“आमचं सँडविच करण्याचा डाव होता”

काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. सत्ताधारी सरकार दोन्ही पक्षातील दागी नेत्यांवर बोलत होते. चर्चेत खेळवत ठेवून आमचं सँडविच करण्याचा डाव होता. मात्र हे राजकारण लक्षात आल्यावर आम्ही चर्चा थांबवली, असा दावा आंबेडकरांनी केला. आघाडीबरोबर बोलायचं नाही, मित्रपक्षाला बरोबर घेऊन 288 जागा लढण्याची आमची भूमिका आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.