AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात फक्त शब्दांचे बुडबुडे, प्रवीण दरेकर यांचं टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात कोणतीही भरीव गोष्ट दिसली नाही. नेहमीप्रमाणे केवळ शब्दांचे बुडबुडे होते, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात फक्त शब्दांचे बुडबुडे, प्रवीण दरेकर यांचं टीकास्त्र
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Nov 08, 2020 | 5:31 PM
Share

मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्याला संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांच्या याच संबोधनावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात कोणतीही भरीव गोष्ट दिसली नाही. नेहमीप्रमाणे केवळ शब्दांचे बुडबुडे होते, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. (Pravin Darekar Criticized Cm Uddhav Thackeray)

“मुख्यमंत्र्यांनी आजच्या संबोधनातून फक्त सहानभूतीचं वातावरण निर्माण केलं. कोणताही भरीव गोष्ट त्यांच्या संबोधनातून अधोरेकित झाली नाही. मराठा आरक्षण, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार, महिला अत्याचार याविषयी उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत”, असा निशाणा प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांवर साधला.

“गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलकांचा आक्रोश सुरु आहे. मात्र सरकारच्या कानावर तो आक्रोश पोहोचत नाही. आजच्या संबोधनात मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी बोलायला हवं होतं. मात्र त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकार काय करणार आहे, हे स्पष्ट केलं नाही”, असं दरेकर म्हणाले.

“गेल्या 15-20 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र कित्येक दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना आणखी मदत मिळाली नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही झालेले नाही”, असं दरेकर म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केल्याचं आजच्या संबोधनात सांगितलं. पण फक्त करार करुन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी व्हायला हवी”, असंही दरेकर म्हणाले. दुसरीकडे एस.टी. कर्मचारी दिवाळी कशी गोड साजरी होणार?, असा सवाल करत मुख्यमंत्री त्यांच्या पगाराविषयी बोलले नाहीत, त्यांची दिवाळी गोट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी पावले उचलायला हवीत”, असं दरेकर म्हणाले.

“गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. पुण्याच्या शिरुरची घटना ताजी आहे. असे प्रकार महाराष्ट्रात सातत्याने होत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावरही बोलणं टाळले. एकूणच आजच्या संबोधनात फक्त भावनिक आवाहन करुन जनतेची त्यांनी दिशाभूल केली पण मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या मुद्द्यांवर ते काय करणार आहे? हे त्यांनी स्पष्ट केले नाही. फक्त शब्दांचे बुडबुडे, अशी टीका दरेकरांनी केली.

(Pravin Darekar Criticized Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य

मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...