राज ठाकरेंची घोषणा, उद्धव ठाकरेंना भेटणार

| Updated on: Jan 23, 2020 | 8:39 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray).

राज ठाकरेंची घोषणा, उद्धव ठाकरेंना भेटणार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची घोषणा केली (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray). महाराष्ट्रात पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही, असे काही भाग आहेत. तेथे बाहेरच्या देशातील मौलवी येत असून मोठं कारस्थान तयार होत आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं (Meeting of Raj Thackeray and CM Uddhav Thackeray).

राज ठाकरे म्हणाले, ” माझ्याकडे काही महत्त्वाची माहिती आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात असे काही भाग आहेत जेथे अनेक बाहेरच्या देशातील मौलवी येतात. ते काय करतात माहिती नाही. कारण तेथे पोलिसांनाही जाण्याची परवानगी नाही. त्या ठिकाणी काय शिजतंय, काय होणार आहे हे कळत नाही. परंतू मला जे कळलं आहे त्याप्रमाणे तेथे काही तरी मोठं कारस्थान घडवण्याचा डाव आतमध्ये शिजतो आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मी आज तुम्हाला कुठलीही जागा सांगणार नाही. मी योग्यव्यक्ती असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना भेटून ही माहिती देणार आहे. जर त्यांना ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरज आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे. त्यासाठी मी त्यांना जाऊन भेटणार आहे.”

यावेळी राज ठाकरे यांनी देशातून पहिल्यांदा बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढण्याचीही मागणी केली. ते म्हणाले, “आपण आज अनेक ज्वालामुखी आणि बॉम्बवर बसलो आहोत. कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून यात सर्वात पहिल्यांदा या देशात आलेल्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांना हाकलून लावलं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहे. ते गेलेच पाहिजे.”

भारतात अमेरिकन आणि ब्रिटीश नागरिकांना विसा विचारून कशासाठी विचारलं जातं. मात्र, देशाच्या सीमेवरील इतर भागातून लोक सरळ देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर कायदे करावे लागतील. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.