‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरच्या घोषणांमुळे राज ठाकरे प्रचंड चिडले आणि…

| Updated on: Sep 24, 2022 | 6:41 PM

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.

पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरच्या घोषणांमुळे राज ठाकरे प्रचंड चिडले आणि...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फाईल फोटो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) देखील चांगलेच आक्रमक झाले आहे. ट्विटरवर एक परित्रक जारी करत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली… थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही !

नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे असं ही राज ठाकरे म्हणालेत. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल असे राज ठाकरे यांनी पत्रकात म्हंटले आहे.

माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.